प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना पार्श्वभुमीवर सुमारे दीड वर्षानंतर अंबाबाई मंदिरात नागरीकांना प्रवेश बंद होते. मात्र कोरोना स्थिती काही प्रमाणात नियंत्रणा येत आहे. यामुळे राज्यशासनाने राज्यातील महत्त्वाची मंदीरे सामान्य नागरीकांना ही प्रवेश दिला जात आहे. याच पार्श्वभुमीवर करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन सुरु केले आहे. मात्र अद्याप यात वृद्धांना दर्शन दिले जात न्हवते. मात्र आज पासुन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला महत्वपूर्ण निर्णय घेतला असुन यापुढे वृद्धांना ही दर्शन घेता येणार आहे.
तसेच दोन डोस झालेल्या गर्भवती महिला आणि ६५ वर्षावरील नागरिकांना घेता येणार दर्शन आहे. याचबरोबर या नागरिकांना देखील ई-पास राहणार बंधनकारक असणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे.