ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले नाहीत, तर यावेळी संसदेला घेराव घालण्यात येईल. त्यावेळी तिथे चार लाख नव्हे तर चाळीस लाख ट्रॅक्टर येतील, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले.
टिकैत राजस्थानमधील सिकर येथे संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने आयोजित महापंचायतीत बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने नवे कृषी कायदे मागे घेतले नाहीत, तर संसदेला घेराव घालण्यात येईल. त्याची तारीख संयुक्त किसान मोर्चा ठरवेल. यावेळी चार लाख नव्हे तर चाळीस लाख ट्रॅक्टर येतील.तसेच आंदोलनकर्ते शेतकरी इंडिया गेट जवळील उद्यानांमध्ये नांगरणी करून शेती करतील.
२६ जानेवारीला लाल किल्ल्यावर हिंसाचार घडवून देशातील शेतकऱ्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र काही समाजकंटकांकडून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.