प्रतिनिधी / सातारा
कोरोना काळातील वीज बिले कमी करा अथवा माफ करा या मागणीसाठी आम्ही जावळीकर चळवळीच्यावतीने
तहसिल कार्यालय जावळी येथे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वीज बिलांची होळी करण्यात आली. या प्रसंगी बोलताना श्री विलासबाबा जवळ म्हणाले सामान्य वीज ग्राहक संतापला असून आज बीले जाळतो आहे. पुढील काळात कनेक्शन तोडाल तर संतापलेला सामान्य माणूस थांबणार नाही, त्याचा उद्रेक होईल भिती यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना काळात मिटर रिडींग न घेताच वीज वितरणने वीज ग्राहकांना अंदाजे बिले देवून वाढीव बिलांचा शॉक देवून झटका दिला. लॉकडावून काळात हाताला काम नसल्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या जनतेने यापूर्वीच वीजबिले भरणार नसल्याचे जाहिर केले आहे. अनेक संघटनांच्या आंदोलनानंतर उर्जामंत्री मा.नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना दिलासा दिला जाणार असल्याचे जाहिर केले होते. त्यामुळेच आर्थिक संकटात असलेल्या वीज ग्राहकांनी वाढीव व अवाजवी आकारलेली वीज बिले न भरता शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते. पण उर्जामंत्र्यांनी वीज ग्राहकांचा भ्रमनिरास केला आहे.
उर्जामंत्री मा.नितीन राऊत यांच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही जावळीकर चळवळीच्यावतीने जाहिर निषेध करण्यात आला. वीज बिले कमी करण्याचे निवेदन मा.उर्जामंत्र्यांचे नावे निवेदन मा.तहसिलदार जावली यांना देण्यात आले. त्यानंतर वीज बिलांची होळी करण्यात आली. या वेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष बजरंग चौधरी, महेश पवार, संतोष कासुर्डे,अरूण जवळ, सुनिल धनावडे, विजय महाराज शेलार,राजेंद्र जाधव,सुभाष मिस्त्री,पांचाली पवार, कलाबाई पवाल, शामल चव्हाण इ.उपस्थित होते.