म्हापशात नववर्ष स्वागत समितीतर्फे 17 वा.सार्वजनिक गुढी कार्यक्रम उत्साहात
प्रतिनिधी / म्हापसा
आज ब्रह्मध्वज उभारला जात असताना ब्रह्मदेवाने श्रुष्टी निर्माण केली. दुसरा म्हणजे राष्ट्रध्वज व तिसरा आत्मध्वज. आत्मध्वजाचे विस्मरण झाल्याने भारतात अंधकार व समस्या निर्माण झाल्या. विश्व राष्ट्र व व्यक्ती या तिघांना ताठ मानेने राहून पाय मातीमध्ये आणि माथा आकाशामध्ये अशा प्रकारचा जीवन सांगणारा, गुढी पाडव्याचा उत्सव आहे असे प्रतिपादन प्रा. अनिल सामंत यांनी म्हापसा येथे बोलताना केले.
म्हापसा नववर्ष स्वागत आयोजित येथील टॅक्सी स्थानकावर सार्वजनिक गुढी उभारणी प्रमुख अतिथी नारायण राठवड ज्येष्ठ पत्रकार यांच्याहस्ते झाल्यावर प्रमुख वक्ते या नात्याने प्राध्यापक अनिल सामंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे या नात्याने ज्येष्ठ पत्रकार व योग शिक्षक नारायण राठवड, प्रा. अनिल सामंत, समितीचे अध्यक्ष वैभव राऊळ, तेजस कवळेकर, अमय भर्तू, प्रणीता धुमाळ, वामन परब खोर्जुवेकर, प्रसाद पार्सेकर, बादल कारेकर, अशोक साळगावकर, दिगंबर हरमलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या राष्ट्रामध्ये मानसिक दृष्टय़ा हा देश ग्रासलेला आहे. त्याला योग्य उत्तर म्हणजे हा गुढी पाडवा उत्सव होय. या उत्सवात प्रतिकारमक्ता आहे. असे ते प्रा. सामंत म्हणाले.
सर्वत्र कोरोनाची भीती असताना गुढी पाडव्याचा उत्सव फक्त म्हापशात का तर कोरोनाचे व्हेकसीन आले आहे हे प्रतिकारात्मक विचार आहेत. मोठय़ा प्रमाणात नाही तरी ही परंपरा चालूच ठेवावी कारण भारतीय संस्कृतीचे जे मूलभूत विचार आहे ते नववर्ष स्वागत समितीने म्हापशात दाखवून दिले आहे. आज या वर्षामध्ये प्रभू रामचंद्राचे स्मरण होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत स्व. वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणाबरोबर प्रभूचेही स्मरण करा. आमची जन्मभूमी व माता स्वर्गाहून श्रेष्ठ आहे असे विचार प्रभू रामचंद्राने त्यावेळी दिले आहे. ब्रह्मधअवज, राष्ट्रध्वज व आत्मध्वज हे तिघे महत्त्वाचे आहे. सोनेरी इतिहासात लिहावा अला इतिहास निर्माण झाला. राम राज्य होण्यासाठी प्रभू रामचंद्राचे स्मरण करणे गरजेचे आहे असे प्रा. सामंत म्हणाले.
आपल्या घरामध्ये गुढी पाडवा होणार आह.s हा ध्वज उतरल्यानंतर ब्रह्मध्वजाचा जगामधील पहिला ॐ नामाचा मंत्र म्हणण्याची गरज आहे. त्याचा उच्चार घरात केला पाहिजे. नंतर राष्ट्रासाठी वंदे मातरम् व गुढीची तिलक लावताना आपले पाय मातीमध्ये आहे काय याकडे लक्ष द्या. आपली मुलं बिघडायला लागली तर भारतीय संस्कृतीने जगाला सर्वात मोठे भगवतगीता ग्रंथ दिले. कोणते तर घरामध्ये आपल्या संस्कृतीने दाखवून दिले आहे असे प्रा. सामंत म्हणाले. घरामध्ये सरस्वतीची आराधना झाली पाहिजे. आपल्या घरामध्ये प्राणायम योग, संगीत, ऐकले पाहिजे. आपल्या सर्व खेळामध्ये भगवंतताचे ध्यान आहे. हा उत्सव म्हणजे प्रत्येक विचारांचे चिंतन, आत्मचिंतन व मनन. जगामध्ये एक काळ होता सर्वजण भारताला डोळे मारून बघत होते. मात्र आज कुणाची भारताकडे पाहण्याचे हिंमत राहिली नाही. असे प्रा. अनिल सामंत शेवटी बोलताना म्हणाले.
नारायण राठवड यांनी सर्वांचे स्वागत करून कोरोना काळातही नववर्ष स्वागत समितीने सलग 17 व्या वर्षी येथे गुढी पाडवा उत्सव आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. तनीशा मावजेकर यांनी ईशस्तवन तर सई वझे यांनी गायलेल्या वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.