वारणानगर / प्रतिनिधी
केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेस सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी हातकंणगले लोकसभा मतदार संघाचे खा. धैर्यशील माने यानी भारत सरकारचे कामगार आणि रोजगार मंत्री ना.भूपेंद्र यादव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजने अंतर्गत सरकारी अनुदान मंजूर झाले आहे. रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार योजनाची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. ती आणखी ६ महिने म्हणजे ३१ सप्टेंबर पर्यंत वाढवण्याची विनंती करण्यात आली आहे. इतर सरकारी योजनांच्या तुलनेत या योजनेचे फायदे आणि महत्त्व खरोखरच जास्त आहे आणि त्यामुळेच या अनुदानादरम्यान अनेक नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. पण तरीही नवीन मिळविण्याच्या अनेक संधी आहेत आणि बरेच लोक या योजनेत येण्यास इच्छुक आहेत याचा विचार करून मुदतवाढ देण्याची मागणी करत असल्याचे खा. धैर्यशील माने यानी पत्रात नमूद केले आहे.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजने अंतर्गत सहभागी होणाऱ्या कर्मच्याऱ्यास पगाराप्रमाणे दोन वर्ष प्राव्हीडंट फंड व पेन्शनची रक्कम व ७ लाख रू. विमा संरक्षण केंद्र सरकार भरणेसाठी अनुदान मंजूर आहे या योजने बाबत ग्रामीण भागात फारसी माहिती नाही त्यामुळे गावागावात सेवा सोसायटी, पतसंस्था, दूध संस्था तसेच इतर संस्था व छोट्या खाजगी उद्योगातील कर्मचारी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचीत आहेत सर्वानाच या योजनेत सहभागी होता यावे यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेची केद्राने मुदतवाढ करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन खा.धैर्यशिल माने यांनी केले.