प्रतिनिधी / बेळगाव
शहरात पाणीपुरवठा करणाऱया उपसा केंद्राचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने उत्तर विभागात दि. 29 व 30 रोजी पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होणार आहे. मात्र शहराच्या दक्षिण भागात पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे.
आदर्शनगर हिंदवाडी येथे जलवाहिनीला गेल्या दोन आठवडय़ांपासून गळती लागली आहे. नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यामधूनच पाणी वाया जात आहे. येथील रस्त्याचे काम करताना जलवाहिनी फुटून ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच हे सर्व पाणी बाजूला असलेल्या खड्डय़ात झिरपत आहे. या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याकडे पाणीपुरवठा मंडळाने दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. शहराच्या एका भागात कमी पाणीपुरवठा तर दुसऱया भागात अपव्यय होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.