आज आदिकवी महषी महर्षी यांची जयंती! महषी वाल्मिकी यांच्याबद्दल नेहमीच एक कथा सांगितली जाते, वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याची! वाल्मिकी ऋषींचे मूळ नाव रत्नाकर. तो निषाद जमातीतील. तो जंगलात राहून वाटमारी करत असे व अनेकांचे धन द्रव्य लुबाडून त्यांना मारून टाकत असे. अशाच वेळी एकदा नारदमुनी तिथून जात असताना त्यांनाही तो लुबाडण्यासाठी आला. नारदमुनी म्हणाले, ‘माझ्याजवळ या तंबोऱयाखेरीज लुबाडण्यासारखे काही नाही. आजपर्यंत तू हे जे काम करत आहेस ते कोणासाठी?’ रत्नाकर म्हणाला, ‘माझ्या बायको मुलांसाठी.’ मुनी म्हणाले, ‘तुझी बायको-मुलं तुझ्या ह्या पापाचे वाटेकरी होण्यास तयार आहेत का विचारून ये आणि मग तू मला मार.’ रत्नाकर घरी गेला आणि त्याने घरी विचारले असता त्याच्या पापात वाटेकरी व्हायला कोणीही तयार नव्हते. त्याला वाईट वाटले आणि तो पुन्हा जंगलात नारदमुनींना भेटायला गेला. त्याने सर्व हकिकत त्यांना सांगितली. मुनी म्हणाले, ‘तुला या पापातून मुक्त व्हायचे असेल तर मी सांगतो तो मंत्र म्हणत तपश्चर्या कर.’ त्यानी त्याला ‘राम राम’ असे म्हणायला सांगितले. पण त्याला तेही म्हणता येईना. उलट तो ‘मरा मरा’ म्हणू लागला. परंतु त्याच्या नकळत त्याचे ‘राम राम’ कधी झाले, हे त्यालाच कळले नाही.
कित्येक वर्षे निघून गेली. त्याच्यावर वाळवीने आपले वारूळ तयार केले, तरीही त्याला कळले नाही. एक दिवस त्याच वाटेने नारद मुनी येत असता त्यांना ‘राम राम’ असा आवाज ऐकू येऊ लागला. तो त्या वारुळातून येत होता. ते वारूळ फोडल्यानंतर त्यात दाढी-मिशा वाढलेला, केस वाढलेला रत्नाकर रामनामाच्या जपात रंगून गेलेला होता. नारदमुनी त्याच्यावर प्रसन्न झाले. वाल्मीक म्हणजे वारूळ. वारुळातून बाहेर पडलेला म्हणून नारदांनी त्याचे नाव वाल्मिकी ठेवले. तुझ्या हातून ‘राम-कथेवर’ ग्रंथनिर्मिती होईल असा आशीर्वाद त्याला दिला. अशा प्रकारे एका लुटारू रत्नाकराचा वाल्मिकी ऋषी झाला.
एक दिवस वाल्मिकी ऋषी तमसा नदीच्या तीरावर स्नानासाठी गेले असता, त्यांनी एक क्रौंच पक्षाची जोडी प्रेमालापात रंगून गेलेली पाहिली. तेवढय़ात एका निषादाने बाण मारून त्यातील नराला विद्ध केले. त्याची मादी जोराने आक्रोश करू लागली. तिचा विलाप ऐकून वाल्मिकींच्या मनात अपार करुणा निर्माण झाली. ह्रदय द्रवले. त्याच अवस्थेत त्यांच्या तोंडून एक शाप श्लोकरूपाने बाहेर पडला.
मा निषाद प्रतिष्ठा त्वमगम: शाश्व्रती समा:।
यत्क्रौचमिथुनादेकं वधी: काममोहितम्।।
अर्थ:- हे दुष्ट निषादा, तू प्रेमालापात मग्न असलेल्या क्रौंच पक्षाला मारलेस. जा, तुला कधीही प्रति÷ा प्राप्त होणार नाही. तुलाही तसाच वियोग सहन करावा लागेल.
त्यानंतर त्यांनी अलौकिक असे ‘रामायण’ हे प्रभू रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित महाकाव्य लिहिले. हे एका ऋषींनी लिहिलेले पहिलेच महाकाव्य. ते पहिलेच कवी म्हणून त्यांना आदिकवी महषी वाल्मिकी म्हटले जाते. तर रामायण हे अजरामर आदिकाव्य. रामकथेवर आधारित अन्य कवींच्या साहित्याचा स्रोत रामायण हाच आहे. ज्यात वाल्मिकींनी प्रभू रामाच्या जीवनाचे सात कांडांमध्ये (सर्गात) वर्णन केले आहे. त्यात प्रामुख्याने श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, हनुमान इ. चे वर्णन आहे. ही पात्रे उत्कृष्ट आदर्शांचे नमुने आहेत. पित्राज्ञेचे पालन, बंधुप्रेम, स्वामीनि÷ा, एकवचनी, एकपत्नी, एकबाणी श्रीरामाचे चित्र रेखाटले आहे. पुढील श्लोक त्याचे साररूप सांगणारा आहे.
यान्ति न्यायप्रवृत्तस्य तिर्यंञ्चोएपि सहायताम्।
अपन्थानं तु गच्छन्तं सोदरोएपि विमुञ्चति।।
अर्थात् न्यायमार्गाने चालणाऱयाला पशुसुद्धा मदत करतात. पण चुकीच्या मार्गाने चालणाऱयाला त्याचा सख्खा भाऊसुद्धा सोडून देतो.
श्रीराम न्यायमार्गाने चालले होते, म्हणून अस्वले, वानर इ. पशुनींही त्यांना मदत केली. पण रावणाचा मार्ग चुकीचा असल्यामुळे त्याचा सख्खा भाऊ बिभीषणही त्याला सोडून गेला.
जसे वेद आणि उपनिषदे आपल्याला प्राचीन जीवनमूल्यांची ओळख करून देतात, त्याच प्रकारे रामायण आणि महाभारत आपल्याला पूर्वजांचे आदर्श आणि विश्वास याविषयी माहिती देतात. रामायण, महाभारतासारख्या ग्रंथांनी भारताच्या राष्ट्रीयत्वाचे प्रतिनिधित्व केले आहे. रामायणातील एकूण श्लोकांची संख्या 24,000 आहे त्यातील सात खंडांची नावे पुढील प्रमाणे -1. बालकाण्ड 2.अयोध्याकाण्ड 3.अरण्यकांड 4.किष्किंधाकाण्ड 5.सुंदरकांड 6.युद्धकाण्ड आणि 7. उत्तरकांड अशी आहेत. सत्ययुग, त्रेता आणि द्वापार या तिन्ही युगांमध्ये वाल्मिकींचा उल्लेख सापडतो.
श्रीरामांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक घटनेची त्यांना माहिती होती. जेव्हा श्रीराम वाल्मिकी आश्रमात आले होते तेव्हा त्यांनी वाल्मिकींना साष्टांग दंडवत घातला. रामचरितमानसमध्ये तुलसीदास म्हणतो,
‘तुम त्रिकालदर्शी मुनिनाथा,
बिस्व बंदर जिम तुमचे हाथां’
श्रीरामांनी त्यांचा अशा शब्दात गौरव केला की, त्रैलोक्मयाचे ज्ञान असणारे तुम्ही स्वत:च प्रभू आहात. सारे विश्व आपल्या हातात एका बोराप्रमाणे भासते. वाल्मिकी मुनींनी रामायणात सूर्य, चंद्र तसेच अनेक नक्षत्रांच्या स्थितीचे वर्णन केले आहे. त्यावरून ते ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्राचेही उत्तम जाणकार होते, हे स्पष्ट होते. अशा ह्या आदिकवी महषी वाल्मीकींना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
अनुराधा दीक्षित