प्रतिनिधी/ बेळगाव
येथील आदित्य इंजिनियरिंग कन्सल्टिंग कंपनीतर्फे बुरुड गल्ली येथील गरजु कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन काळात जीवनावश्यक साहित्य मिळविण्यासाठीही सामान्य नागरिकांना धडपड करावी लागत आहे. हाताला काम नसल्याने आर्थिक चणचण भासत आहे. अशा 60 ते 70 गरजू कुटुंबांना सोमवारी आदित्य इंजिनियरिंग कन्सल्टिंग कंपनीतर्फे वस्तूंचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी सचिन उसुलकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.