प्रतिनिधी/ बेळगाव
ज्या सरस्वती वाचनालयाच्या वास्तुत किर्लोस्करांच्या ‘शाकुंतल’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला त्याच वास्तुमध्ये शनिवारी जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे आदिनाथ पाटील यांचे नाटय़ गायन झाले.
प्रारंभी बेळगावचे ज्ये÷ रंगभूषाकार मनोहर बिर्जे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नाटय़ परिषदेतर्फे बेळगाव शाखेच्या अध्यक्षा संध्या देशपांडे, नाटय़ांकुरतर्फे अरुणा नाईक, मंथनतर्फे सुरेखा भावे व फुलोरातर्फे वीणा लोकूर तसेच मनोहर बिर्जे यांची नात तेजस्विनी यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. गायक राजप्रभू धोत्रे यांना कलाश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांच्याच हस्ते नटराज पूजन करण्यात आले. आनंद गाडगीळ यांच्या हस्ते गायक व वादकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘शाकुंतल’मधील पंचतुंड नररुंड माळ या नांदीने झाली. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नंतर देवल, कोल्हटकर, खाडीलकर यांनी रंगभूमीचे सुवर्णयुग उभे केले. खाडीलकर उत्तम पत्रकार असल्याने कर्झनच्या अत्याचारावर त्यांनी ‘किचकवध’ लिहिले. त्यांना काव्याचीही उत्तम जाण होती. त्यांच्याच ‘मंदारमाला’ या नाटकातील ‘या नव नवल नयनोत्सवा’ हे गीत आदिनाथ यांनी सादर केले.
‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटक अजरामर झाले. यातील एक गीत तरी आपण गावे असे प्रत्येक गायकाला वाटते. या नाटकाच्या निर्मितीवेळी त्यातील संगीताची जबाबदारी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे होती. परंतु मध्येच अचानक अभिषेक बुवा गायब झाले आणि सर्वांनाच चिंता लागली. 15 दिवसांनी जेव्हा अभिषेकी परतले तेव्हा ‘कटय़ार’ची सर्व गाणी त्यांनी एका पाठोपाठ गावून दाखविली. त्यातीलच ‘घेई छंद मकरंद’ हे गीत आदिनाथ यांनी सादर केले.
1955 ते 1960 हा नवतेचा काळ तर संगीत रंगभूमीच्या अस्ताचा काळ. पण विद्याधर गोखले यांनी या रंगभूमीला तारले. त्यांनीच लिहिलेले मंदारमाला या नाटकातील ‘जय शंकरा गंगाधरा’ हे गीतही यावेळी सादर झाले. स्वातंत्र्यप्रेमी सावरकर म्हणजे एक व्यक्ती नव्हे तो विचार आहे. त्यांनी गौतम बुद्धांच्या जीवनावर ‘सन्यस्त खड्ग’ हे नाटक लिहिले. या नाटकातील मूळ बंदीश आहे ‘मो मन के फसीया’ तर सावरकरांचे शब्द आहेत, ‘सुक तातची जगीया’ हे नाटय़गीत गाऊन आदिनाथ यांनी सांगता केली. त्यांना आकाश पाटील यांनी तबल्याची तर वामन वागुकर यांनी संवादिनीची साथ केली.
प्रारंभी कीर्ती टेंबे यांनी स्वागत करून सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. या सर्व गीतांचे अनुरुप असे निवेदन डॉ. संध्या देशपांडे यांनी केले. गायक व वादकांची ओळख मौसमी भातकांडे यांनी करून दिली. समीना मुल्ला यांनी आभार मानले.