सुधाकर काशीद / कोल्हापूर
गावाकडचा कोरोना
कुत्रा म्हणजे कोणाही अनोळखी माणसाची जनावराची चाहूल देणारा प्राणी. तो भुंकू लागला की ओळखायचं, त्याला कशाची तरी चाहूल लागली आहे. पण अंबाई धनगर वाडÎा जवळच्या खोत वाडीतल्या कुत्र्यांचा आवाज रात्री बंद होतो. कारण या परिसरात खूप दाट जंगल आहे. बिबटÎांचा वावर आहे. बिबटÎासाठी कुत्रे हे सहज मिळणारे खाद्य आहे. आणि इथल्या कुत्र्यांनाही त्याचा चांगलाच अंदाज आहे. त्यामुळे कदाचित आपला माग बिबटयाला लागू नये म्हणून या धनगर वाडÎातील कुत्री रात्री सुरक्षित जागी स्वतःला कोंडून घेतात. किंवा इथले धनगर रात्री बिबटÎापासून कुत्र्यांना वाचवण्यासाठी त्यांना घरात बांधून ठेवतात. अशा वातावरणात इथल्या धनगर वाडÎात तेरा कुटुंबे राहतात.
हा धनगर वाडा चांदोली व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीलगत आहे. व्याघ्रप्रकल्पाची हद्दआणि या धनगर बांधवांची वस्ती यात केवळ हाकेचे अंतर आहे. या धनगरवा डÎाला लागून काप नावाचा खडा डोंगर आहे .त्याचे दगड कधी घसरतील हे सांगण्याच्या पलीकडे आहे त्यामुळे ती एक भीती त्यांच्या सोबत कायम आहे .आणि आता त्यात कोरोना संसर्गाची भर पडली आहे. या धनगर वाडÎातले तरुण मुंबईला वेगवेगळ्या कापड दुकानात कामाला आहेत. मुंबईतली उलाढाल ठप्प झाल्याने त्यातले काही जण गावाकडे परत आले आहेत. आणि संसर्ग कमी झाला नाही तर पुढच्या उदरनिर्वाहाचे काय? या चिंतेतच आपापल्या कुडाच्या घरासमोर बसून आहेत.
किचकट भौगोलिक परिस्थिती, रोजगाराची गावाजवळ उपलब्ध नसलेली संधी आणि अक्षरशः जंगलाच्या कडेला एका डोंगराच्या पायथ्याला दहा-बारा घरांचे हे गाव आहे. अशा वातावरणात गेल्या अनेक पिढÎा संपल्या आहेत. जगायचं म्हणून जगायचं अशी इथली परिस्थिती आहे. पण अलीकडे तरुण पोरांनी हात पाय हलवल्याशिवाय आता पर्याय नाही हे ओळखून मुंबई गाठली आहे. डोक्यावर मोठी बुट्टी घेऊन त्यात सामानाची वाहतूक आणि कापडाच्या दुकानात पडेल ते काम, यावर त्यांची मुंबईत गुजरान चालू आहे. कोल्हापूर जिल्हा सधन संपन्न म्हणणायांनी एकदा या धनगर वाडÎाला पाय लावण्याची गरज आहे.
या धनगर वाडÎा लगतच व्याघ्रप्रकल्प आहे. त्यामुळे वन खात्याचे खूप निर्बंध इथल्या रहिवाशांच्या वर आहेत. जळणासाठी वाळलेली लाकडे गोळा केली तरी गुन्हा दाखल होण्याची भीती आहे. गावाकडे यायचा रस्ता देशाच्या स्वातंत्र्यानंतर आता एका महिन्यापूर्वी झाला आहे. नळाचे पाणी पंधरा दिवसापूर्वी आले आहे. कोरोनाचे सावट साया परिसरावर आहे. मुंबईकर जरूर गावाकडे आले आहेत पण कोरोना लवकर जाऊ दे एवढेच त्यांचे गावाचे दैवत अंबाई देवीकडे गार्हाणे आहे. त्यांचे गार्हाणे देवी ऐ केलं की नाही हा पुढचा भाग आहे. पण कोल्हापूर जिह्यातील राजकारणी राहू दे ,पण वेगवेगळ्या क्षेत्रातील धुरिणांनी तरी एकदा हा धनगर वाडा प्रत्यक्ष जाऊन पहाण्याची याक्षणी गरज आहे