नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्ग सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने शिक्षक पात्रता परीक्षेची सात वर्षांची वैधता संपुष्टात आणली होती. शिक्षक किंवा इच्छुक उमेदवार एकदा का टीईटी परीक्षा पास झाला की, त्याचे ते प्रमाणपत्र सात वर्षेच वैध होते. आता ही मुदत संपवून केंद्र सरकारने एकदा परीक्षा पास झाला की टीईटी प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय 2011 पासून लागू करण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी २०११पासूनचे उमेदवार ग्राह्य धरले जाणार आहेत. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना यामुळे रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे.
ttps://twitter.com/ANI/status/1400367458242887681?s=20
शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा पास होणे खूप महत्त्वाचे आहे. एकादा परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांना परत परत परीक्षा द्यावी लागणार नाही.