गोकर्णनजीक बीचवर आठ महिन्यांत 12 जणांनी गमावला जीव : पर्यटकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता : सूचना फलकांकडे अक्षम्य दुर्लक्ष
पी. के. चपगावकर / कारवार
गोकर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्रकिनाऱयावर दाखल होणाऱया पर्यटकांना आनंद लुटा मात्र, स्वतःला सांभाळा, असे सांगण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. कारण 1 जानेवारीपासून आजअखेर गोकर्णजवळच्या बीचवर पोहण्यासाठी समुद्रात उतरून बारा जणांनी जीव गमावला तर अनेकांना बुडण्यापासून वाचविण्यात आले आहे.
गेल्या आठ महिन्यांत अधिकतर कालावधीत कोरोनामुळे पर्यटनावर बंदी घातली होती. पर्यटनावरील निर्बंध शिथिल केलेल्या थोडय़ा कालावधीतही समुद्रात उतरून बारा जणांनी आपल्या जीवावर पाणी सोडले आहे. ही आकडेवारी बरेच काही सांगून जाते.
जिल्हय़ाच्या कुमठा तालुक्मयातील गोकर्ण हे पुरातन प्रसिद्ध श्रीक्षेत्र. गोकर्ण दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखले जाते. गोकर्ण येथे जगप्रसिद्ध आत्मलिंग असलेले श्री महाबळेश्वर देवस्थान आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी प्रत्येक दिवशी येथे शेकडो श्रद्धाळू दाखल होत असतात.
निसर्गसौंदर्याची अतिश्रीमंती!
अरबी समुद्राच्या किनाऱयावर वसलेले आणि गंगावळी व अघनाशिनी नद्यांनी वेढलेले गोकर्ण निसर्गसौंदर्याच्या बाबतीत अतिश्रीमंत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. गोकर्णपासून काही किलोमीटर अंतरावर कुडले बीच, ओम बीचसारखे स्वच्छ, सुंदर आणि काहिसे निर्मनुष्य समुद्रकिनारे म्हणजे निसर्गसौंदर्याचा खजिना. या समुद्रकिनाऱयावरील दृश्ये अतिशय विहंगम आणि डोळय़ांची पारणे फेडणारी आहेत. त्यामुळे पर्यटकांची पावले या समुद्रकिनाऱयांकडे वळू लागली आहेत.
देशी श्रद्धाळू किंवा पर्यटकांची गोकर्णजवळच्या समुद्रकिनाऱयाकडे पावले पडण्यापूर्वीच विदेशी पर्यटक या किनाऱयांवर दाखल झाले. विदेशी पर्यटकांच्या वास्तव्यामुळे हे समुद्रकिनारे अधिक प्रकाशझोतात येऊन, अनेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनून राहिले. विदेशी पर्यटकांच्या आगमनासह समुद्रकिनारा परिसरात मद्यासह अन्य आक्षेपार्ह वस्तूंची रेलचेल सुरू झाली. त्यामुळे किनाऱयावर दाखल होणाऱया पर्यटकांच्या संख्येत अधिकच भर पडू लागली.
समुद्रात पोहण्याचा मोह
किनाऱयावर दाखल होणाऱया पर्यटकांना पोहण्याचा मोह होऊ लागला. तथापि, पर्यटक समुद्रात उतरू लागले व गटांगळय़ा खाऊ लागले. सेल्फीच्या नादी लागलेल्या पर्यटकांना लाटांचे भान राहिले नाही. पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट कशी असते, याची कल्पना नसलेले पर्यटक बळी पडू लागले आहेत.
गोकर्ण येथील समुद्रकिनाऱयावर ओम बीच, कुडले बीचवर पोलीस, होमगार्ड खात्याने सूचना फलक लावले आहेत. तथापि, दुर्दैवाने पर्यटक या फलकांकडे दुर्लक्ष करतात. सूचना देऊनही विशेष करून युवावर्ग कानाडोळा करतो आणि जीव गमावून बसतो. यामध्ये दक्षिण कर्नाटकातील अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांचा भरणा अधिक असतो. गोव्यातील समुद्रकिनाऱयावर कार्यरत असलेल्या पेट्रोलिंगसारखी व्यवस्था येथेही करावी, अशी सूचना संबंधितांना केली आहे. तथापि, या सूचनेची अद्याप दखल घेतलेली नाही. समुद्रकिनाऱयावर जीवरक्षकांच्या संख्येत वाढ करावी. त्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेऊन वेळेत मानधन द्यावे, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. कारण हे लोक स्वतःचा जीव धोक्मयात घालून इतरांचे जीव वाचवितात.