कुडाळ / प्रतिनिधी
साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावरील कामगारांनी आज अचानकपणे काम बंद केले. त्यामुळे टोल नाक्यावरील व्यवस्थापन कोलमडले. या टोल नाक्यावर 2 ते 3 किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या 3 महिन्यांपासून या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने त्यांनी हे अचानक कामबंद आंदोलन केले आहे. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहनधारकांचा होणारा खोळंबा पाहता टोलनाक्यावर गाड्या अडविण्यासाठी असलेले बुम बाजूला घेतले. त्यामुळे हजारो वाहने विना टोल जातायत.