अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकावर साधला निशाणा
ऑनलाईन टीम / मुंबई
गेल्या काही दिवसात देशातील अनेक ठिकाणी महापूराने थैमाने घातले आहे. महाराष्ट्रात ही अनेक ठीकाणी या पूरामूळे जीवीत आणि वित्तहानी झाली. या आपत्तीमूळे अनेक राजकिय नेत्यांचे दौरे होत असतात. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी अनूभव स्पष्ट केला. शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत पूरग्रस्त भागातले दौरे टाळण्याचं आवाहन राजकीय नेत्यांना केलं. अनावश्यक राजकीय दौऱ्यांमुळे प्रशासकिय यंत्रणा काहीशी बदलावी लागते. आणि राजशिष्टाचार पाळावे लागतात. यामुळे मुख्य कामासाठी यंत्रणा कमी पडते. असे म्हटले होते. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधत शरद पवार यांना ही टोला लगावला आहे.
भातखळकर यांनी एक ट्विट करत ”आपण करायचे नाही, इतरांना करू द्यायचे नाही असा ठाकरे सरकारचा खाक्या आहे. संकटाच्या काळातही राजकारण सुटत नाही. बिघडलेला रिमोटही याला अपवाद नाही”. असे म्हणत शरद पवारांना टॅग करणे ही विसरलेले नाहीत. तसेच कोकणात भाजपा नेते पोहोचले तेव्हा प्रशासनाचा गाडा हलला. असे ही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये नमुद केले आहे.
काय म्हणाले होते शरद पवार
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं”, असं पवार यांनी सांगितलं.