मुंबई / अधिवेशन
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आमदार नितेश राणे राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या शेरेबाजीने कारणाने गाजले आहे. या शेरेबाजीचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासह राज्यातील राजकारणावर पडलेला आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन केले जात होती. त्यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना बघुन म्याव-म्याव असा अवाज काढला होता. या प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले असून तसेच आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावरुन आमदारांचे कान टोचले आहे
“यंदाचे अधिवेशन हे जनतेच्या प्रश्नांच्या तुलनेमध्ये कुत्र्या-मांजरांच्या आवाजानेच जास्त गाजले आहे. हा सर्व प्रकार अत्यंत लज्जास्पद आहे. ज्या लाखो मतदारांनी विश्वास टाकल्यानंतर आमदार सभागृहापर्यंत पोहोचतात, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाहीत. असे वागलो तर लाखो मतदारांच्या विश्वासाला तडा जाईल. सदस्यांनी आपण काय बोलतोय, याचे भान ठेवा” असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांचे कान टोचले आहे.