युवा कार्यकर्त्यांचा म्हापशात भाजपात प्रवेश
प्रतिनिधी /म्हापसा
भाजपवर आज लोक खुष आहेत त्यामुळेच युवा पिढी भाजपात प्रवेश करीत आहे. मोदीच्या नेतृत्वाखाली ज्या विविध योजना प्रस्ताव असेल, विविध योजना सुरू केल्या त्या घरोघरी पोचण्यास सरकार भर देईल. म्हापशात आज युवक येतात यात म्हापसा मतदारसंघ 100 टक्के विजयी झाल्याचे निश्चित आहे. स्वार्थी राजकारणाला आम्ही थारा देणार नाही. आणि स्वार्थ साधत नाही म्हणून भाजपवर टिका करणे हे आम्ही खपवून घेणार नाही. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा येथे बोलताना केले.
यावेळी आमदार जोशुआ डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपची तत्वे व विविध योजना सर्वांपर्यंत पोचविण्यास आम्ही सदैव झटणार आहोत. म्हापसा शहर स्वच्छ व अतीसुंदर बनविण्यास नवभारत करण्यासाठी व स्वयंपूर्ण देश बनविण्यासाठी राज्यातील सर्व युवा पुढी सदैव आमच्या बरोबर राहणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
15 तारीखपर्यंत राज्यात सभाना बंदी
मतदान काळात प्रत्येकानी कोविडचया नियमावलीचे पालन करावे. 15 ते 18 वयोगटासाठी लस सुरू झाली ती घ्यावी. 60 वरील डोस घ्यावी यावर आम्ही मात करणार. ताप आल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवून त्यावर होम कोरोन्टाईन करून घ्यावे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 15 तारीख पर्यंत राज्यात सभा नाही. कोविड नियंत्रणात आला तर पुढील उपाययोजना आखू असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात सध्या वर्ग बंद आहे मात्र परीक्षा ऑफ लाईन घेतल्या जात आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, पदवी परीक्षा मुलांच्या करिअरच्याबाबतीत महत्त्वाच्या आहेत. मुलांनी समजून घ्यावे. नाहक मोर्चा स्ट्राईक करू नये. येथे नाहक कुणीही राजकारण आणू नये. आम्हाला मुलांच्या चिंता आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. पोलीस जिल्हाधिकाऱयांकडे याकडे बारकाईने लक्ष ठेवून राहणार आहे असे ते म्हणाले.
आज तरुण वर्ग भाजपात प्रवेश करीत आहेत ही खरोखरच अभिनंदनीय गोष्ट आहे. या सर्वांच्या सहकार्याने 22 नव्हे तर 30 हून अधिक जागा भाजप सहज जिंकेल असे प्रतिपादन म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी युवा पिढीच्या भाजपा प्रवेशवेळी केले.
भाजपचा विजय निश्चित मग लोबोचे काय सांगता
मंत्री मायकल लोबो आपल्या स्वार्थापोटी कदाचित पक्ष सोडला असेल. मात्र देश प्रथम, राज्य प्रथम या तत्वावर म्हापशातील अनेकजण भाजपात रुजू होत आहे. आणि यात भाजपचा विजय निश्चित आहे मग आम्हाला लोबोचा काहीच फरक पडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.