बसपावर आपला पक्ष विकल्याचा आरोप
दिल्ली / प्रतिनिधी
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी शुक्रवारी बसपा नेतृत्वावर शिरोमणी अकाली दलाला पक्ष विकून अनुसूचित जाती समुदायाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. तसेच “राज्याची संपत्ती लुटण्याचे उद्दिष्ट असलेल्या आधुनिक काळातील ईस्ट इंडिया कंपनी” असे संबोधून त्यांनी आम आदमी पक्षाची (आप) निंदा केली.
बहुजन समाज पक्षावर (बीएसपी) निशाणा साधत चन्नी म्हणाले की, हा पक्ष यापुढे बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत नाही. पक्ष अकाली दलाला विकून त्यांच्या नेतृत्वाने अनुसूचित जाती समुदायाच्या पाठीत खंजीर घातला, असे चन्नी म्हणाले. बसपने त्यांना दिलेल्या 20 जागांपैकी 15 जागा अकाली दलाला विकल्याचा आरोप त्यांनी केला. बसपा नेतृत्वाने स्वतःला अकाली दलाचे गुलाम बनवले आहे, असेही ते म्हणाले.