ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
आसाममध्ये आफ्रिकन ‘स्वाईन फ्लू’ने 13 हजार डुक्करांचा बळी घेतला आहे. आसामचे पशू संवर्धन मंत्री अतुल बोरा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मागील महिन्यात देशात आफ्रिकन स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला. आसाममार्गे हा स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला असून, 25 एप्रिलनंतर 3 मे पर्यंत आसाममधील 306 गावांमधील 2500 हून अधिक डुक्करांचा यामुळे मृत्यू झाला होता. आता आसाममधील डुक्करांच्या मृत्यूची संख्या 13 हजारांवर पोहचली आहे.
डुक्करांच्या वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर काझिरंगा नॅशनल पार्कमधील डुक्करांनी बाहेर पडू नये, म्हणून एक मोठा कालवा अगोरातोळी रेंजपासून खणण्यात आला आहे. जेणेकरुन जंगलातली रानडुकरे ही गावांकडे जाणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे, असेही बोरा यांनी सांगितले.