खानापूरातील दिव्यांगांनी चक्क पायी बेळगाव गाठले, रात्री उघडय़ावरच सरदार्स मैदानावर वास्तव, मागण्यांसाठी दिले निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
एक जण पायाने दिव्यांग तर एक जण हाताने दिव्यांग असून देखील तब्बल 25 कि.मी. पायी चालून शुक्रवारी जिल्हाधिकाऱयांची भेट घेवून आमच्या समस्या सोडविणार काय? अशी विनवणी केली. खानापूर येथून गुरूवारी दुपारी 2 वाजता हे दिव्यांग पायी बेळगावला आले. त्यांना रात्री 10 वाजले. त्यामुळे सरदार्स मैदानावरच रात्र काढली. त्यानंतर सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धडक मारुन विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
सध्याच्या महागाईमध्ये आम्हाला देण्यात येत असलेल्या 1500 रुपयांमध्ये आम्ही जीवन जगू शकत नाही. किमान 4 हजार 500 मासिक पेन्शन द्यावी, याचबरोबर काम करण्यासाठी आम्हाला व्यवसाय उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे. त्यासाठी जमीन मंजूर करावी, इतरांप्रमाणे आम्हालाही किमान दहा हजार रुपयांचे सहाय्यधन द्यावे, यासह इतर मागण्या या दिव्यांगांनी निवेदनाव्दारे केल्या आहेत.
खानापूर तालुक्मयामध्ये जवळ 4 हजार 500 दिव्यांग आहेत. तेंव्हा खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातच दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देण्याची सोय करावी. डॉक्टर नाहीत म्हणून आम्हाला बऱयाचवेळा परत पाठविण्यात येते. योग्य प्रकारे छाननी करुन आम्हाला प्रमाणपत्रे द्यावीत, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.
महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पांडुरंग गुरव, मष्णू पाटील, महम्मदरफीक जमादार, अनिल सावंत, नालसाब शेख यांच्यासह दिव्यांग उपस्थित होते.