मोठय़ा यंत्रांच्या साहाय्याने खनिज वाहतूक : सरकारी यंत्रणेचा की राजकीय व्यक्तींचा आशीर्वाद?
प्रतिनिधी / बेळगाव
खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागातील आमटे येथे खासगी जमिनीवर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन करण्यात येत आहे. याकडे संबंधित सर्वच खात्यांनी दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिवसाढवळय़ा मोठय़ा यंत्रांच्या साहाय्याने याठिकाणी उत्खनन करून मोठय़ा ट्रकमधून खनिज वाहतूक करण्यात येत आहे. यामुळे सरकारी यंत्रणेचा वरदहस्त आहे की कोणत्या राजकीय व्यक्तींचा आशीर्वाद आहे? अशी चर्चा संपूर्ण पश्चिम भागात सुरू आहे. या उत्खननामुळे आमटे गावचे अस्तित्व धोक्मयात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे उत्खनन सुरू असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.
बेळगाव-गोवा महामार्गालगतच आमटे गावाला जाणाऱया रस्त्याच्या बाजूला हे उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी जेसीबी, पोकलँड, व्हीललोडर, मोबाईल क्रशर यासह इतर यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. इतक्मया मोठय़ा प्रमाणात उत्खनन होत असताना याठिकाणी पर्यावरण खाते, वनखाते, महसूल खाते, भूगर्भ खात्याची परवानगी घेण्यात आली आहे का? तसेच खानापूर तालुक्मयाचा पश्चिम भाग हा वन संरक्षित ग्रीनबेल्ट अतिसंवेदनशील भाग घोषित केला आहे. याठिकाणी कोणतेही काम करण्यासाठी केंद्र सरकारपासून राज्य सरकारच्या सर्व परवानग्या आवश्यक असतात. खानापूर तालुक्मयाला सध्या वाळू माफिया, लँड माफिया, खनिज माफियांचा विळखा पडला आहे. यातून खानापूरच्या भवितव्याला धोका निर्माण झाला आहे. तालुक्मयातील काही एजंटांना हाताशी धरून हे माफिया आपला कार्यभाग साधत आहेत, असे चित्र दिसून येत आहे.
एकमेकांकडे बोट
उत्खनन सुरू असल्याबाबत खानापूर तहसीलदार, महसूल अधिकारी, भूगर्भ खाते तसेच वनखाते यांच्याशी संपर्क साधला असता एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भूगर्भ खात्याचे लोहार हे खानापूर तालुक्मयाचे निरीक्षक म्हणून काम पाहतात. त्यांच्याशी संपर्क साधला असता थ्री ए व्ही या नियमाखाली जमीन सपाटीकरण करण्याची परवानगी असते. ती परवानगी सर्व्हे नंबर 109 याठिकाणी देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. सपाटीकरण आणि उत्खननात फरक असल्याचे दिसून येते. याबाबत त्यांना विचारले असता आपण वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क करावा, मी बेळगावाबाहेर आहे. वन खात्याचे कणकुंबी विभाग आरएफओ संतोष यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्याकडून कुठलीच परवानगी घेण्यात आलेली नाही.
याबाबत सरकारी यंत्रणा का कारवाई करत नाही? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. तर दुसरीकडे आमटे गावातील सरकारी जमिनीवरही मोठय़ा प्रमाणात उत्खनन सुरू आहे. याबाबत ग्राम पंचायत, पीडीओ, ग्राम पंचायत सदस्य व इतर यंत्रणा का गप्प आहेत. पीडीओ मोकाशी यांच्याशी संपर्क साधला असता तेही उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत.
सामान्य नागरिकांना वनखाते जंगलात फिरण्यास मनाई करते. तसेच जंगलातील दगड किंवा माती घरकामासाठी आणण्यास मुभा देण्यात येत नसताना गेले दोन महिने दिवस-रात्र याठिकाणी उत्खनन करून खनिजाची वाहतूक करण्यात येत आहे. यासाठी कोणत्या राजकीय शक्तीचा हात आहे का? काय आर्थिक देवाण-घेवाण यामुळे शासकीय यंत्रणा गप्प आहे? असा सवालही नागरिकांतून विचारला जात आहे.
पुन्हा अवैध वाहतूक दिवसाढवळय़ा सुरू
या उत्खननामुळे तालुक्मयाच्या पर्यावरणाचा ऱहास होण्यास वेळ लागणार नाही. पर्यावरणवाद्यांनी याबाबत आवाज उठविणे आवश्यक आहे. जर योग्य ती कारवाई केली गेली नाही तर आमटे गावचे अस्तित्व धोक्मयात येणार आहे. खानापूर तालुक्मयातील पर्यावरणप्रेमींनी, जागरूक नागरिकांनी याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे. अन्यथा खानापूरच्या निसर्गाची विल्हेवाट लागण्यास वेळ लागणार नाही. खानापूर तालुक्मयातील निसर्ग संपत्तीचा आनंद घेण्यासाठी, संशोधनासाठी, अभ्यासासाठी अनेक निसर्गप्रेमी खानापूरच्या जंगलात येत असतात. यापूर्वी या भागातून मोठय़ा प्रमाणात खनिजाची अवैध वाहतूक करण्यात येत होती. त्यावेळी कारवाई करण्यात आली होती. पुन्हा ही अवैध वाहतूक दिवसाढवळय़ा सुरू झाल्याने कारवाईचे नाटक होते का? मात्र अवघ्या सहा महिन्यांतच पुन्हा हे उत्खनन सुरू झाले आहे.