चाळीस वर्षानंतर घडला इतिहास
धामोड / प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील तुळशी प्रकल्पातील ६५ शेतकऱ्यांना चाळीस वर्षानंतर आमदार प्रकाश आबिटकर व पाटबंधारे विभाग यांच्या प्रयत्नातून पाणी परवाने मिळाले. आमदार प्रकाश आबिटकर कार्यकारी अभियंता रोहित बांदीवडेकर, तुळशी शाखाअभियंता विजयराव आंबोळे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना पाणी परवान्यांचे वाटप करण्यात आले.
राधानगरी तालुक्यातील धामोड खोऱ्याला वरदान ठरणाऱ्या तुळशी प्रकल्पाची उभारणी १९७८ साली झाली. परंतू प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना धरण क्षेत्राच्या बॅक वाटरमधून पाणी परवाने मिळण्यात कायदेशीर अडचणी होत्या. याकरीता आमदार प्रकाश आबिटकर, पाटबंधारे विभाग यांनी विशेष बाब म्हणून हा प्रश्न शासन दरबारी मार्गी लावला . संबधित ६५ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाणी उपसा परवान्यांचे वाटप (बुरंबाळी, ता.राधानगरी ) येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच जावेद मोमिन होते .
स्वागत शाखा अभियंता विजयराव आंबोळे यांनी केले. या नविन परवान्यांच्यामुळे गेल्या चाळीस वर्षातील शेतकऱ्यांची मागणी पूर्णत्वास नेऊ शकलो याचे समाधान मिळाल्याचे आमदार आबिटकर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले . नविन परवांन्यांच्यामुळे अंदाजे ३००ते ३५० एकर क्षेत्र ओलीताखाली येण्यास मदत होणार असून यापुढेही ज्या शेतकऱ्यांना पाणी परवाने हवे असतील त्यांनी पाटबंधारे विभागाकडे अर्ज करावेत असे अवाहन कार्यकारी अभियंता बांदिवडेकर यांनी केले.
यावेळी तुळशी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष के. डी. इंगवले, माजी सरपंच अनिल आड्रेकर, उदयोजक कृष्णात कोंडे, पोलिसपाटील बाळकृष्ण पाटील (आपटाळ) माजी उपसरपंच सुभाष गुरव, डॉ . प्रितम नलवडे , कॉन्ट्रॅक्टर बापूसो तामकर, शिवाजी गुरव, मारूती तामकर, विठ्ठल पाटील, आदीसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. आभार मोजणीदार एम. के. पाटील यांनी मानले