बेंगळूर/प्रतिनिधी
वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांनी केएमएफचे अध्यक्ष आणि अरभवीचे आमदार भालचंद्र जारकिहोळी यांना प्रलंबित जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि उत्तर कर्नाटक प्रदेशासाठी नवीन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. तसेच भालचंद्र यांना जलसंपदा मंत्री कराअशी मागणीही त्यांनी केली आहे.
गुरुवारी येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील यांनी, “भालचंद्र जारकिहोळी यांना या क्षेत्राच्या हितासाठी मंत्री बनविण्याबाबत आम्ही आपले मत व्यक्त केले आहे. बरीच सिंचन प्रकल्प रखडली आहेत आणि पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.” असे ते म्हणले.
मंत्री पाटील यांनी रमेश जारकिहोळी यांनी स्वतः सर्वोच्च अधिकाऱ्यांकडून घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. “राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले आहे आणि आम्हाला आशा आहे की लवकरच तपास पूर्ण होईल आणि ते निर्दोष बाहेर पडतील.” असे म्हणाले.