प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना.. नही तो तुझे और तुम्हारे परिवार को ठोक देंगे’ अशी फोनवरून धमकी राजापूरचे आमदार राजन साळवी यांना देण्यात आल़ी प्रकल्पाला शिवसेना पक्षाचाच विरोध असताना केवळ राजन साळवी यांनाच का धमकी देण्यात आली, या बाबत चर्चांना उढत आला आह़े या घटनेची गंभीर दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी साळवी यांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे केली आह़े
राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला सुरूवातीपासूनच विरोधाची भूमिका घेतली होत़ी 10 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास आमदार राजन साळवी यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाचा फोन आल़ा यावेळी या इसमाने रिफायनरीला विरोध केल्यास गंभीर परिणाम होतील, अशा आशयाची धमकी दिल़ी तसेच रात्री 11 वाजून 14 मिनिटांनी पुन्हा राजन साळवींच्या मोबाईलवर पुन्हा फोन आला. यावेळी समोरील इसमाने साळवी यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल़ी या प्रकरणी आमदार साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आह़े हा फोन गुजरात राज्यातून आल्याचे बोलले जात आह़े या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाचा फोन नंबरची तपासणी करण्यास सुरूवात केली आह़े तसेच संशयित आरोपीला पकडण्यासाठी शहर पोलिसांकडून पथकही तयार करण्यात आले आह़े
मागील 12 वर्षापासून राजापूर येथून आमदार असलेल्या राजन साळवी यांना आलेल्या धमकीने रत्नागिरी जिह्यात खळबळ उडाल़ी अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी साळवी यांना फोन करून विचारणा केल़ी रत्नागिरीचे आमदार व राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले आह़े यामध्ये मंत्री सामंत यांनी आमदार साळवी यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आह़े तसेच संबंधित धमकी देणाऱया इसमाला तत्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी मंत्री सामंत यांनी केली आह़े