मुंबई/प्रतिनिधी
पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाने चार राज्यांवर आपला ताबा मिळवला आहे. पण पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेस आणि भाजपाचा मोठा पराभव केला आहे. तसेच शिवसेनेलाही अपेक्षित यश मिळालं नाही. यावर भाजप नेते शिवसेनेवर टीका करत आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उत्तर प्रदेश भाजपचचं राज्य होतं, त्यामळे तिथे त्यांना विजय मिळाला पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. समाजवादी पक्ष ४२ वरुन १२५ वर पोहोचला असून जागा तिप्पट वाढल्या आहेत. भाजपाच्या विजयात ओवैसी, मायावतींचं योगदान आहे त्यामुळे त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा लागेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच लोकशाहीत विजय-पराभव होत असतो. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजपाचा विजय झाल्याचं आम्हाला दु:ख होण्याचं कारण नाही. तुमच्या आनंदात आम्हीदेखील सहभागी आहोत, असं संजय राऊतांनी म्हंटल आहे.