आसाम पोलीस अॅक्शन मोडमध्ये
ऑनलाईन टीम / दिसपूर
सीमा वादा टोकाला गेल्याने आसाम आणि मिझोराम पोलीस यांच्यात काही दिवसांपूर्वी धुमसचक्री उडाली. दोन्ही राज्यांच्या पोलीस दलांमध्ये झालेल्या या हिंसाचारात आसाम पोलीस दलातील सहा जण आणि एका नागरिकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा वाद अद्याप थांबलेला नाही. यावर मिझोराम खासदार वनलालवेना यांनी आसाम पोलीस भाग्यवान होते की आम्ही त्या सर्वांना मारले नाही. जर ते परत आले तर आम्ही त्या सर्वांना मारु, असे वक्तव्य केले होते. आसाम पोलिसांनी या हिंसाचारामागे कट करत मिझोराम खासदार यात सामील असल्याचे सांगितले आहे.
खासदार वनवेला यांनी संसदेबाहेर बोलताना २०० पेक्षा अधिक पोलिसांनी आमच्या भागात प्रवेश करत आमच्याच पोलिसांना मागे ढकलले. आम्ही गोळीबारापूर्वी आसाम पोलिसांनी गोळीबाराचे आदेश दिले होते. ते भाग्यावान आहेत की त्यांना आम्ही ठार केले नाही. यानंतर ते परत आलेच तर त्या सर्वांना आम्ही मारु.
यावर आसामचे पोलीस महासंचालक जी.पी. सिंह यांनी बुधवारी एक ट्विट केले. यात त्यांनी खासदार वनलालवेना यांनी माध्यमांना दिलेले निवेदन आणि त्यांच्या घटनेमागील षडयंत्र संबंधित कारवाईची योजना आखत आहेत व या कटात त्यांची सक्रिय भूमिका असल्याचे संकेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.