भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला पुढे गंमतीने सांगतात-आम्ही निश्चयें उदासीन । स्त्रीपुत्रादिकामनाशून्य । अर्थस्वार्थकामविहीन । काय म्हणोन तें ऐका ।निजात्मसुखाची उपलब्धी । तिणें पूर्णता मनोबुद्धी । अक्षुब्ध जैसा अमृतोदधि । तैसा समाधि सर्वत्र ।म्हणसी एवढा यदुसमुदाय । तुमच्या योगें चालता होय । यदर्थीं ऐकें विदर्भतनये । कोणा न्यायें वर्ततसों ।गृहामघ्यें जैसा दीप । प्रकाशें सर्व कार्यकलाप । चालवूनियां साक्षिरूप । क्रिया अल्प न स्पर्शे ।आम्ही वर्तों ऐशिया परी । उदास देहगेहांवरी । वधूसुतधनकामांची उरी । आम्हांमाझारी न वसे पैं ।भ्रतारांची उदासीनता । दु:खें साहों न शकती वनिता । हें जाणोनि मन्मथजनिता । रुक्मिणीचित्ता क्षुब्ध करी ।आपुलें औदासीन्य प्रकट । स्वमुखें कथितां कंबुकंठ । तेणें दाटला रुक्मिणीकंठ । हृदयस्फोट होऊं पाहे ।
आम्ही खरोखरच देह व घरदार यांविषयी उदासीन आहोत. स्त्री, संतान आणि धन यांची आम्हाला आकांक्षा नाही. आम्ही निष्क्रिय असून दिव्यासारखे साक्षीदार आहोत. आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच पूर्णकाम आहोत. कृष्णाने स्वतःच्या मुखातून आपली उदासीनता प्रकट केली. आपला पती असा उदासीन आहे हे जाणून रुक्मिणीला अत्यंत वाईट वाटले.
व्यंग्योक्तीचें उपसंहरण । मुख्यत्वें हेंचि तत्कारण ।
इतुकीं वाक्मयें श्रीभगवान । बोलोनि इत्यर्थ जो धरिला ।भगवंताच्या प्रेमगुणें । भीमकी जाणे स्वलावण्यें । सर्वांहूनि प्रियतमपणें । मजकारणें हरि मानी ।ऐसा वैदर्भीचा दर्प । निरसावया मन्मथबाप ।
उपहासवाक्मयांचा कलाप । इतुका बोलोनि आवरिला ।इतुकें कृष्ण बोलिल्यावरी । भीष्मकरायाची कुमारी । विदर्प होवोनि अभ्यंतरिं । मानी मेरु कोसळला ।
महामुनी श्रीशुकदेव म्हणतात- श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नसल्याकारणाने रुक्मिणीला ‘आपणच यांना सर्वाधिक प्रिय आहे.’ असा झालेला गर्व नाहीसा करण्यासाठीच भगवंत एवढे बोलले आणि गप्प राहिले.
त्रैलोक्मयाचा नायक हरि । निजवल्लभ तो व्यंग्योत्तरिं । बोलतां भंगली अभ्यंतरिं । तें अवधारिं नृपवर्या ।जन्मापासूनि जो प्रियतम । तयाच्या वदनें वाक्मये विषम । ऐकतांचि भंगलें प्रेम । मानसीं श्रम संचरला ।द्योतमाना रुक्मिणी देवी । जिणें हीं वाक्मये कदापि पूर्वीं । ऐकिलीं नव्हतीं तीं ऐकूनि जीवीं । चिन्हे भयाचीं उमटलीं ।हृदयामाजी खोचली वेगीं । कंप दाटला सर्वांङ्गीं । जलप्रवाह नेत्रमार्गीं । करणवर्गी वैकल्य । आपले प्रियतम त्रिलोकेश्वर भगवंतांचे पूर्वी कधीच न ऐकलेले हे अप्रिय बोल जेव्हा रुक्मिणीने ऐकले, तेव्हा ती भ्याली. तिचे हृदय धडधडू लागले. चिंतेच्या अथांग सागरात ती गटांगळय़ा खाऊ लागली. अखेर ती रडू लागली. नखशशाङ्ककलाकिरण । तिहीं रंजित पदतळ अरुण । तया चरणें भूलेखन । करीत राहिली तटस्थ ।कज्जलमिश्रित अश्रु स्रवती । सजल कृष्ण कर्दमें क्षिति । टपटपां सिंपीत होत्साती । अधोमुखी स्फुंदतसे ।डबडबूनि आला धर्म । तेणें द्रवलें कुचकुंकुम । तत्कर्दर्में अंषुकोत्तम । शोणायमान भासतसे Ad. देवदत्त परुळेकर