ऑनलाईन टीम/तरुण भारत
रताच्या ईशान्येकडील नागालँड राज्याच्या मोन जिल्ह्यात शनिवारी ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात किमान १४ लोकांचा मृत्यू होता. दरम्यान, नागालँडमध्ये लष्कराचा गोळीबार ही चूक असल्याचे केंद्र सरकारने सोमवारी संसदेत मान्य केले. लष्कराच्या गोळीबारात १४ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी संसदेत सरकारकडे जाब विचारला होता. याप्रश्नी सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सरकारची बाजू मांडली. त्यानुसार लष्कराने नागरिकांची ओळख पटवण्यात चूक केल्याची कबुली देत गैरसमजातून मजुरांवर गोळीबार केला असे शाह म्हणाले. यावर पीडित व्यक्तीने अमित शाह यांचा दावा फेटाळला असून इशारा न देताच सर्व बाजूंनी गोळीबार केल्याचं म्हंटलं आहे.
दरम्यान, नागालँडमध्ये जवानांनी गैरसमजातून मजुरांवर गोळीबार केला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सदनांत सोमवारी निवेदनाद्वारे दिली. यांनतर पीडित व्यक्तीने अमित शाह यांचा दावा फेटाळला आहे. त्याने “कोळसा खाणीत काम संपवल्यानंतर आम्ही पिक-अप ट्रकमधून घऱी परतत होतो. त्याचवेळी अचानक आमच्यावर गोळीबार सुरु झाला. नागालँडमधील मोन जिल्ह्यात अतिरेक्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या २१ पॅरा कमांडो गटातील जवानांनी तिरू गावाभोवती गराडा घातला होता. संशयित अतिरेकी समजून वाहनाला थांबवण्याचा आदेश देण्यात आला. मात्र, या आदेशानंतरही वाहन न थांबता भरधाव गेल्याने जवानांनी वाहनावर गोळीबार केला. या गोळीबारात वाहनातील ८ जणांपैकी ६ ठार झाले.