वाळपई प्रतिनिधी :
सत्तरी तालुक्मयातील शेळ मेळावली याठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या आयआयटी प्रकल्पासंदर्भात विरोधकांनी केलेली मागणी पंचायत मंडळाच्या आवाक्मयात नाही. त्यासंदर्भात वरि÷ अधिकाऱयांकडे सल्ला घेण्याच्या दृष्टिकोनातून कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केलेले आहेत.
यासंदर्भाची माहिती या प्रकल्पाच्या विरोधकांना देण्यात आलेली आहे. ते करीत असलेला आरोप हा निरर्थक स्वरूपाचा असून पंच सभासदांची जबाबदारी स्वीकारताना कोणत्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य होणार नाही याची विशेष दखल घेतल्यामुळे या पंचायत मंडळाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात आक्रमक स्वरूपाची भूमिका वठविली याचे स्पष्टीकरण गुळेली पंचायतीच्या मंडळांनी केले आहे.
एकूण घडलेल्या प्रकरणासंदर्भात पत्रकारानी त्यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला असता पंचायत मंडळाने या संदर्भात सविस्तर माहिती दिली. 31 ऑगस्ट रोजी प्रकल्पाच्या विरोधकांनी यापंचायत मंडळाशी संपर्क साधून याप्रकल्पाला पंचायतीचा विरोध असल्याचे लेखी पत्र पंचायतीच्या लेटरहेडवर देण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात आपण पंचायत मंडळाची बैठक घेऊन या संदर्भात चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले होते.
अशा प्रकारची माहिती सरपंच अपूर्वा चारी यांनी यावेळी दिली. त्यासंदर्भात बैठक झाल्यानंतर सदर बैठकीमध्ये पंचायत मंडळ यासंदर्भाचे लेखी पत्र देऊ शकते का यासंदर्भात सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
मात्र अशा प्रकारचा अधिकार पंचायात मंडळाला नसून त्यासंदर्भात पंचायत खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधून यासंदर्भात सल्लामसलत करण्यात यावा अशा प्रकारची सूचना अनेक पंच सभासदांनी केल्यानंतर या संदर्भाचा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. आज प्रकल्पाच्या विरोधकांनी पंचायत मंडळाची झालेल्या चर्चेत त्यांना हवे असलेले पत्र न दिल्याबद्दल तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केलेला आहे. मात्र पंचमंडळ अशा प्रकारचे निर्णय कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन घेऊ शकत नाही. यामुळे या संदर्भात कायदेशीर सल्ला व वरि÷ अधिकाऱयांचे मत आजमावून घेणार असल्याचे सरपंच अपूर्वा चारी यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी त्यांच्यासमवेत उपसरपंच नितेश गवडे पंच सभासद विठ्ठल कासकर अस्मिता मेळेकर विनोद गावकर यांची उपस्थिती होती.