वाळपई मतदारसंघ काँग्रेस गट समितीचा आरोप
वाळपई / प्रतिनिधी
गुळेली – मेळावली येथे उभारण्यात येणाऱया आयआयटी प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते दुतोंडी स्वरूपाची भूमिका घेत असून त्यांनी अशी भूमिका घेऊन नागरिकांच्या विश्वासघात करू नये. या प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरुच असून जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र पद्धतीने सुरूच राहणार असल्याचा इशारा मतदारसंघ काँग्रेस गट समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केलेला आहे.
या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून त्यात कोणत्या प्रकारचा खंड पडला नसल्याचा गट समितीचा दावा आहे. त्याचप्रमाणे वाळपईचे आमदार विश्वजित राणे हे ढोंगी बाबा असून त्यांना हिंमत असल्यास त्यांनी जनतेसमोर यावे असे आवाहन समितीने दिले आहे.
या समितीची पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी काँग्रेस समितीचे अध्यक्ष दशरथ मांदेकर, महिला काँग्रेस समितीचे अध्यक्ष रोशन देसाई, सरचिटणीस नंदकुमार कोपर्डेकर, कार्यकारी समितीचे पदाधिकारी सुरेश कोदाळकर, मोहम्मद खान यांची खास उपस्थिती होती.
यावेळी दशरथ मांदेकर यांनी सांगितले, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शेळ मेळावली या ठिकाणी आले होते. त्यांनी एकूण परिस्थिती पाहणी केली आहे. त्यांनी स्वतः सदर भागांमध्ये काजू बागायती लागवड असल्याचे मान्य केलेले आहे. असे असताना त्याने अचानकपणे सदर प्रकल्प हा त्याच ठिकाणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसऱया बाजूने मुख्यमंत्री सदर भागातील जनतेला इतरत्र जमीन उपलब्ध करून शेती बागायती करण्याचे आवाहन करीत आहे. त्यांना कृषी विकासाच्या बाबतीत थोडा तरी गंध असता तर त्याने अशा प्रकारची विधाने केली नसती. गेल्या अनेक वर्षापासून सदर भागांमध्ये केलेल्या बागायती यांच्यावर पाणी सोडून दुसऱया ठिकाणी बागायती उभ्या करून त्यांचे उत्पन्न कधी मिळणार, असा सवाल मांदेकर यांनी केलेला आहे .
विश्वजित राणे यांना आपल्या जनतेचे काही पडलेले नाही. वाळपई मतदारसंघांत अनेक समस्या असताना ते या मतदारसंघात येत नाही. हे खरोखरच मतदारांचे दुर्दैव आहे. आज अनेक ठिकाणचे रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. दुसऱया बाजूने बेरोजगारी वाढत आहे मात्र ते वाळपई मतदारसंघात येण्याऐवजी पणजीत राहून वायफळ बडबड करीत असल्याचा आरोप दशरथ मांद्रेकर यांनी केला. त्यांना खरोखर हिंमत असल्यास त्यांनी मतदारसंघातील जनतेसमोर यावे व आयआयटी संदर्भात आपले स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन समितीने दिलेले आहे. मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे काम जोमाने सुरू असून आतापर्यंत 15 बुथ समित्यांची नियुक्ती केलेली आहे. त्याप्रमाणे मतदारसंघात समितीमध्ये 40 जणांची नियुक्ती केलेली आहे. केंद्र सरकारने देशामध्ये शेतकऱयाच्या विरोधात जो निर्णय घेतलेला आहे त्यासंदर्भात मतदारसंघांमध्ये सह्यांची मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 1200 शेतकऱयांनी यासंदर्भात आपला निषेध व्यक्त करून सह्या केलेल्या आहेत. समितीचे सरचिटणीस नंदकुमार कोपर्डेकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आतापर्यंत सत्तरी तालुक्मयाच्या विरोधातच अनेक प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत.आयआयटी प्रकल्प व म्हादई नदीच्या संदर्भात सरकारचा केलेला निष्काळजीपणा हा सर्वसामान्यांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे.