दिल्ली/प्रतिनिधी
आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावीत किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. या पात्रता निकषात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी बदल केल्याचे जाहीर केले. दरम्यान मंत्री रमेश यांनी या जेईई (ऍडव्हान्स) २०२१ ही पात्रता परीक्षा ३ जुलै २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल असे म्हंटले. यावर्षी जेईई (ऍडव्हान्स) आयआयटी खरगपूर घेणार आहे.