वाळपई / प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांपासून सत्तरी तालुक्मयात खैरीच्या झाडांची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत आहे. गुळेली पंचायत क्षेत्रातील आयआयटी प्रस्तावित जागेतील मुरमुणे याठिकाणी बुधवारी रात्री खैरीच्या झाडांची कत्तल करून त्यांची तस्करी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. यामुळे सदर भागांमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रमुख रस्त्याच्या शेजारी असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.
बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडण्याची शक्मयता आहे. गुरुवारी सकाळी मुरमुणे भागातून काही नागरिक गुळेली याठिकाणी जात असता या झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्यामुळे रस्ता बंद झाला होता. याबाबतची माहिती मिळताच आयआयटी विरोधी प्रकल्पाचे आघाडीचे कार्यकर्ते शशिकांत सावर्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन हा रस्ता स्वतः मोकळा करण्यास महत्त्वाचे योगदान दिले. दरम्यान सदर ठिकाणी असलेल्या दोन खैरीच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. सदर झाडे जुन्या स्वरूपाची होती .यामुळे बाजारपेठेमध्ये या दोन झाडांची किंमत जवळपास एक लाखाच्या आसपास होण्याची शक्मयता वर्तविण्यात आलेली आहे.
याबाबत शशिकांत सावर्डेकर यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार हा प्रकार बुधवारी मध्यरात्री किंवा गुरुवारी पहाटे होण्याची शक्मयता आहे. ज्या ठिकाणी या दोन झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे हा भाग पूर्णपणे निर्मनुष्य स्वरूपाचा आहे .रात्री 8 नंतर या रस्त्यावरून अभावानेच वाहतूक होत असते. याचा फायदा घेऊन कटरच्या माध्यमातून मोठय़ा झाडांची कत्तल करण्यात आली व सदर झाडांची तस्करी करण्यात आल्याचे सावर्डेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, रस्त्याच्या बाजूला अशाप्रकारे झाडांची कत्तल करून त्याची तस्करी करण्याचा प्रकार हा भागातील नागरिकांसाठी खळबळ निर्माण करणारा आहे .
दरम्यान, याबाबत वाळपई विभागीय वनाधिकारीच्या सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ज्याठिकाणी या झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे सदर भागात आयआयटी प्रस्तावित क्षेत्रात समावेश करण्यात आलेला आहे. यामुळे या जागेची मालकी आयआयटी व्यवस्थापनाकडे आहे .अर्थातच सरकारच्या महसूल खात्याकडे असल्यामुळे याचा ताबा सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारीकडे आहे. त्यांनी यासंदर्भात तक्रार करणे गरजेचे आहे. तक्रार आल्यानंतर या संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
खैरीच्या झाडांना बाजारपेठेत चांगली मागणी
दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार खैरीच्या झाडांना बाजारपेठांमध्ये चांगल्या प्रकारची मागणी आहे. खास करून कपडे निर्मिती, रंग निर्मिती यासाठी या झाडांच्या गर्भाचा वापर करण्यात येत असतो. कोणत्याही पदार्थाला रंग आणण्यासाठी या झाडाच्या लाकडांचा वापर करण्यात येत असतो. यामुळे बाजारपेठेमध्ये याला चांगल्या प्रकारची मागणी आहे. याबाबत काही सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार लहान स्वरूपात तुकडे करून ते बाजारपेठेमध्ये विकण्यात येत असतात. ज्या दोन झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे सदरची किंमत बाजारपेठेमध्ये एक लाखाच्या आसपास असल्याची शक्मयता आहे.
यापूर्वी खैरीच्या झाडांच्या तस्करीची अनेक प्रकरणे
दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सत्तरी तालुक्मयाच्या घनदाट जंगलामध्ये खैरीच्या झाडांची मोठय़ा प्रमाणात आहे. काही दिवसापूर्वी भिरोंडा पंचायत क्षेत्रतील अडवई या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात खैरीच्या झाडांची कत्तल करून त्यासंदर्भातील तस्करी करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र नोंदणीकृत गाडय़ा ताब्यात घेण्यात आल्या होत्या.
दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार खैरीच्या झाडांच्या तस्करी प्रकरणात मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्मयता आहे. कारण यापूर्वी अशा प्रकारच्या अनेक घटना सत्तरी तालुक्मयांमध्ये घडलेल्या आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग भागातील काही नागरिकांचा यामध्ये समावेश असल्याचा संशय आहे. यामुळे येणाऱया काळातही अशा प्रकारच्या झाडांची मोठय़ा प्रमाणात कत्तल होण्याची शक्मयता आहे. यासाठी वनखात्याने याबाबत आवश्यक स्वरूपात देखरेख ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.