उदय सावंत / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली गाव या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात गाजत आहे. राज्यपातळीवर स्तरावर प्रकल्पाचा मुद्दा आता ऐरणीवर आलेला आहे . यामुळे सरकार व मोठय़ा प्रमाणात दबाव निर्माण झाला असून येणाऱया काळात सरकार खरोखरच हा प्रकल्प मुहूर्त स्परूपात आणणार की तो रद्द करणार अशा प्रकारचा सवाल निर्माण झालेला आहे. मात्र सत्तरी तालुक्मयातील ऐतिहासिक स्वरूपात हे आंदोलन गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी होंडा पंचायत क्षेत्रातील सालेली गावांमध्ये अशाच प्रकारे आंदोलनाची धग निर्माण झाली होती. त्यावेळी पोलिसावर मोठय़ा प्रमाणात दगडफेक करून त्यांना जखमी करण्यात आले होते. जवळपास पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा सत्तरी तालुक्मयातील शेळ मेळावली हा गाव चर्चेला आलेला आहे. सत्तरी तालुक्मयातील ही दोन आंदोलने आतापर्यंत वेगळय़ा धर्तीवर निर्माण झालेली आहे. सालेली याठिकाणी खडी क्रशरच्या विरोधात संपूर्ण गावाने मोठय़ा प्रमाणात आंदोलन छेडले होते. आज आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात शेळ मेळावली व संबंधित गावातील नागरिकांनी आंदोलनाची धग लावून धरलेली आहे. सदर आंदोलनाला गळती लावण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर अनेक स्तरावर करण्यात आला .मात्र पूर्णपणे अयशस्वी ठरला. नागरिकांची व आंदोलनकर्त्यांची एकजूट ही आज खऱयार्थाने या आंदोलनाची महत्त्वाची घटक ठरलेला आहे .गोवा सरकारतर्फे जवळपास साडेतीन हजार कोटी खर्चून आयटी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी 13लाख चौरस मीटर जमीन ताब्यात घेण्यात येणार असून आतापर्यंत दहा लाख चौरस मीटर जमिनीचा ताबा आयटी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाकडे सरकारने दिलेला आहे. येणाऱया काळात उर्वरित तीन लाख चौरस मीटर जमीन व्यवस्थापनाला देण्यात येणार असल्याचे यापूर्वी सरकारने जाहीर केलेले आहे .यामुळे या भागातील गेल्यानेक वर्षापासून ज्याजमिनीमध्ये काजू भात शेती निर्माण करण्यात आलेली आहे. सदर जमीन प्रकल्पाच्या डोझरखाली चिरडली जाणार असल्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पेटून उठलेले आहेत .सध्या ही मशाल सबंध गोव्यामध्ये हे एक वेगळय़ा प्रकारची प्रतिमा निर्माण केलेली असून येणाऱया काळात या मशालीच्या रूपाने मोठय़ा प्रमाणात आंदोलनाची धग सरकार समोर गंभीर परिस्थिती निर्माण करण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
आजच्या याआंदोलनात राजकीय पक्षांनी उडी घेतलेली आहे. काँग्रेस आम आदमी पक्ष यांनी पाठिंबा देऊन आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिलेला आहे. यामुळे येणाऱया काळात या प्रकल्पाच्या माध्यमातून गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात आंदोलन उभे राहण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. सत्तरी तालुक्मयातील आतापर्यंत गुळेली पंचायत क्षेत्रातील फक्त चारच गावांचा या आंदोलनामध्ये सहभागी होता. आता यात याच पंचायत क्षेत्रातील धामसे गावाने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयातील इतर गावही या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. सदर भागातील जमीन जरी सरकारच्या नावावर असली तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षापासून या भागातील भूमिपुत्र या जमिनीच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत .गोव्यात व खासकरून सत्तरी तालुक्मयामध्ये जमीन मालकीचा प्रश्न आज प्रामुख्याने चर्चेला येताना दिसत आहे .गोवा मुक्तीनंतर अनेक सरकारे आली व गेली मात्र सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीचा प्रश्न अजूनही प्रलंबितच राहिलेला आहे. सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकांना जमिनीच्या हक्कापासून दूर ठेवून त्यांच्या समस्येचा फायदा राजकारणी आपल्या राजकीय स्वार्थासाठी करीत आहेत असा आरोप वारंवारपणे करताना दिसत आहेत .सत्तरी भूमिपुत्र संघटनेने गेल्या दोन वर्षापासून हा मुद्दा प्रमुख्याने लावून धरलेला आहे. सत्तरी तालुक्मयात जवळपास साठ टक्के जमीन मालकांसाठी हा प्रश्न अत्यंत जवळचा वाटत आहे .जमिनीची मालकी नसल्यामुळे सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा फायदा घेता येत नाही. त्याचप्रमाणे जमीन असूनही मालकी नाही. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्यासमोर गंभीर स्वरुपाची समस्या निर्माण करताना दिसत आहे.