वाळपई / प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसापासून आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलक आक्रमक बनले आहेत. या प्रकल्पाचे भूमापन बंद करण्याची आग्रही मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. वाळपईच्या पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन आंदोलकांनी आक्रमक स्वरूपाची भूमिका घेतल्यानंतर सध्यातरी सरकारने भूमापन प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून भुमापन प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.
सदर काम आजपासून सुरू होणार असल्याचा सुगावा लागताच पुन्हा एकदा आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरून याला विरोध करण्याचा प्रयत्न केला.. मात्र भूमापन करणारे पथक सदर भागांमध्ये न गेल्यामुळे हे आंदोलन दुपारी 1 वा मागे घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
याबाबतची माहिती अशी की गुळेली याठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात दिवसेंदिवस आंदोलन आक्रमक बनू लागले आहे. मंगळवारी भूमापन करण्यासाठी आलेल्या पथकाला सहा तास अडवून ठेवल्यानंतर दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ बुधवारी जवळपास 400 च्या आसपास आंदोलनकर्त्यांनी पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला होता. यामुळे या प्रकल्पाला दिवसेंदिवस विरोध वाढत असल्यामुळे सरकारने भुमापन प्रक्रिया सध्यातरी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ही प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे .
बुधवारी पोलीस स्थानकावर आंदोलन करण्यात आल्यानंतर पोलीस बंदोबस्तात व भूमापन काम गुरुवारपासून सुरू होण्याची शक्मयता व्यक्त करून आंदोलनकर्ते पुन्हा एकदा आज सकाळपासून रस्त्यावर उतरले होते. सकाळी साडेनऊ ते दुपारी दीडपर्यंत भूमापन करणारे पथक सदर भागांमध्ये न पोहोचल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची एकूण मिळालेल्या माहितीनुसार समजते. जोपर्यंत सरकार हा प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा करीत नाही तोपर्यंत याप्रकल्पाच्या विरोधात आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केल्याचे समजते. काही झाले तरी चालेल मात्र या प्रकल्पाला या भागांमध्ये कोणत्या प्रकारात थारा दिला जाणार नसल्याचे याआंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून याभागातील जैवविविधता पूर्णपणे नष्ट होणार असून सरकारच्या घोषणेनुसार या भागांमध्ये दहा हजार लोक येऊन या भागाचा झपाटय़ाने विकास होत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र याला या भागातील नागरिकांनी तीव्र स्वरूपाचा आक्षेप घेतलेला आहे. आम्हाला काँक्रिटची जंगले नकोत पर्यावरणाचा ऱयास झाल्यास येणाऱया काळात याच भागातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे हा प्रकल्प या भागामध्ये नको अशा प्रकारचा निर्धार या भागातील नागरिकांनी केलेला आहे .यापूर्वी काणकोण नंतर सांगे भागातील नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र स्वरूपाचा विरोध केला होता. यामागची कारणे सरकारने शोधून काढावीत व नंतर या प्रकल्पासंदर्भात आपला निर्णय निश्चित करावा अशा प्रकारची मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे.