भारताबाबत वर्तविण्यात आले भाकीत- दर 9.5 टक्के राहणार
मुंबई ः कोरोनामुळे देशातील अर्थव्यवस्था अडचणीचा सामना करत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताचा जीडीपी दर 3 टक्क्यांनी घटवून 9.5 टक्के होणार असल्याचा अंदाज इंटरनॅशनल मॉनेटरी फंड यांनी व्यक्त केला आहे. या अगोदर मात्र हा जीडीपी दर 12.5 टक्के राहणार असल्याचे सांगितले होते.
आयएमएफने मंगळवारी वर्ल्ड इकॉनॉमी आउटलूक(डब्लूइओ)यांचा ताजा अहवाल सादर केला आहे. सदरच्या अहवालामध्ये मार्च ते मे दरम्यान कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे भारतीय जीडीपी वाढीवर प्रभाव राहिला आहे. आयएमएफचा जीडीपी अंदाज हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 9.5 टक्के इतक्या अंदाजाइतकाच आहे.