आयटीआय विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे आयटीआय विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन तसेच अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्यामुळे ऑनलाईन परीक्षा देणे अशक्मय आहे. तेव्हा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येऊ नये यासाठी आयटीआय विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
कोरोना परिस्थितीत देखील आयटीआय विद्यार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून शिक्षण घेण्यासाठी बरीच धडपड करावी लागली आहे. कोरोना संकटामुळे शिक्षणही अर्धवट झाले आहे. असे असताना आता आयटीआय परीक्षा ही ऑनलाईनच्या माध्यमातून घेण्याचा फतवा काढण्यात आला आहे. मात्र, ऑनलाईनद्वारे परीक्षा देणे अशक्मय आहे. कारण ग्रामीण भागामध्ये अनेक महाविद्यालये आहेत. तसेच विद्यार्थीही ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे वीजसमस्या, सर्व्हर डाऊनसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा पद्धती अनुकूल नाही.
सर्व्हर डाऊनची समस्या सतत भेडसावत आहे. त्यामुळे परीक्षा देणे अडचणीचे आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच परीक्षा घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी विविध आयटीआय कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. कन्नड साहित्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हे निवेदन देण्यात आले.