प्रतिनिधी/ बेळगाव
आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा रद्द करावी तसेच जे शुल्क वाढविण्यात आले आहे ते कमी करावे, यासाठी अखिल भारतीय डेमाक्रॉटीक युथ ऑर्गनायझेशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
आयटीआय विद्यार्थी हे व्यवसायासाठी शिक्षण घेत असतात. त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. असे असताना प्रोत्साहन देण्याऐवजी विविध अटी लादून विद्यार्थ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ते चुकीचे आहे. आयटीआयचे शुल्क वाढविण्यात आले आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड जात आहे. तेंव्हा वाढविलेले शुल्य कमी करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान मागील वर्षाचा निकाल तातडीने लावावा. वर्ष उलटले तरी निकाल लावण्यात आला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा मोठा त्रास होत आहे. तेंव्हा या सर्व समस्या तातडीने सोडविण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अंजुमन महाविद्यालय ते कित्तूर चन्नम्मा चौक आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजू कानगी, अनिल बडगुळे, महांतेश कुडचे, अप्राज हवालदार, मंजूरईलाई मोगल, उमराव देसाई, अकिब अन्सारी, बिलाल काझी, अरसद घीवाले, जाफर बेपारी, तरबेज बागवान, शकील ताशिलदार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.