वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना महामारी संकटामुळे 2020 सालातील आयपीएल क्रिकेट स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला. ही स्पर्धा चालू वर्षांमध्ये पुन्हा सुरळीतपणे घेतली जाईल आणि आरसीबीचा संघ पुन्हा सज्ज असल्याचे आरसीबीच्या क्रिकेट ऑपरेशन विभागाचे संचालक माईक हेसन यांनी सांगितले.
2020 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा 29 मार्च ते 24 मे दरम्यान घेतली जाणार होती पण कोरोना महामारी संकटाला तोंड देण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने ही स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने घेतला. लांबणीवर टाकण्यात आलेली ही स्पर्धा चालू वर्षांच्या अखेरीस घेतली जाईल, अशी आशा हेसन यांनी व्यक्त केली असून रॉयल चँलेजर्स बेंगळूरचा संघ (आरसीबी) सहभागी होण्यासाठी सज्ज राहील, असेही ते म्हणाले.