प्रतिनिधी/ म्हापसा
पाच हजार वर्षांपेक्षा जास्त परंपरा आयुर्वेदाला लाभलेली आहे. रामायण-महाभारत मध्येही आयुर्वेदला महत्त्व होते. अशा आयुर्वेदाला गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी भोंदू म्हणणे देशद्रोही प्रकारचे कृत्य म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दै. तरुण भारतशी बोलताना दिली.
त्या काळात लॉबोरेटरी आणि औषधे नव्हती. आता सर्व शिक्षण दिले जाते. आता शस्त्रक्रियेची परवानगी दिली जाते, अशा आयुर्वेदाला ढोंगी म्हणणे चुकीचे आहे. हे राजकीय विधान असल्याचा आरोप आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला आहे. कामत कुठे ढासळले आहेत हेच कळत नाही. एका बाजूने आयुर्वेदिकच्या डॉक्टरना पगार दिला जात नाही, असा आरोप करताना तर दुसऱया बाजूने आयुर्वेदिक भोंदू म्हणतात. यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा, असा आरोप केंद्रीय मंत्री नाईक यांनी केला. त्यांनी आपले वक्तव्य सुधारावे, आयुर्वेदाला काहीही म्हणणे चुकीचे आहे. आज आयुर्वेदामुळे आम्हाला जागतिकस्तरावर सन्मान मिळत आहे, असेसी नाईक म्हणाले.