ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने फैलावत चालला आहे. त्यातच आता दिल्लीतील आयुष्मान भारत चे ऑफिस सील करण्यात आले आहे. कारण या ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातील 25 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
या बाबतची अधिक माहिती देताना आयुष्मान भारत चे सीईओ डॉ. इंदू भूषण म्हणाले, आमच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याने आम्ही गेले पाच दिवसापासून कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. येेेत्या 24 एप्रिल रोजी कार्याालय सुरू केले जाईल. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, सध्या दिल्लीमध्ये कोरोना बाधितांची संख्या 2 हजारांच्या वर पोहोचली असून 45 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 290 लोकांची प्रकृती स्थिर आहे.