प्रतिनिधी /बेळगाव
केएलई आरएलएस कायदा महाविद्यालयात कनकदास जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. व्ही. एच. हवालदार यांनी कनकदास यांच्या भावचित्राची पूजा केली. भक्त कनकदास यांचे साहित्य अनमोल आहे, असे ते म्हणाले.
प्रा. जी. व्ही. वाघे यांनी भारतीय तत्त्वज्ञान, आध्यात्मिकता हे भारताचे वैभव आहे. मात्र, त्याचे पालन करणाऱयांची संख्या कमी आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या तरुणांनी भक्त कनकदास यांच्या साहित्याचा अभ्यास करावा, असे सांगितले.
प्रा. प्रसन्नकुमार यांनी कोणत्याही व्यक्तीमध्ये ‘मी’पणाचा अहंभाव असू नये. तो ओलांडून आपल्याला पुढे जाता आले पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी प्रा. शांताराम हेगडे, प्रा. एम. एस. कुलकर्णी, अन्य प्राध्यापक, कर्मचारी, शिक्षकवर्ग उपस्थित होता. माधुरी कुलकर्णी यांनी प्रार्थना सादर केली. शिल्पा रायकर यांनी स्वागत करून सूत्रसंचालन व आभार मानले.