याच महिन्यात होणार विवाहसोहळा
रणवीर कपूर आणि आलिया भट्ट दीर्घकाळापासून स्वतःच्या विवाहावरून चर्चेत आहेत. दोघेही आता याच महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजते. दोघेही स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याला प्रकाशझोतापासून दूर ठेवत असतात. हा विवाहसोहळा जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
रणवीरने विवाह सोहळय़ाचे स्थळ म्हणून स्वतःच्या कुटुंबाचे मूळ घर आरके हाउसची निवड केली आहे. त्याचे आईवडिल ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा विवाह 20 जानेवारी 1980 रोजी आरके हाउसमध्येच पार पडला होता. रणवीरच्या विवाहसोहळय़ात 450 अतिथी सामील होतील. याकरता शादी स्क्वाड वेडिंग प्लॅनर्सला नियुक्त करण्यात आले आहे.
विवाहात सामील होणाऱया निकटवर्तीयांना एप्रिलच्या दुसऱया आठवडय़ात मोकळा वेळ काढून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. विवाहाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. कपूर कुटुंबाची एप्रिलच्या अखेरीस विवाहसोहळा आयोजित करण्याची योजना होती. परंतु आलियाचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांची प्रकृती पाहता भट्ट कुटुंबाने हा विवाह लवकरात लवकर करविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आलिया आणि रणवीर पहिल्यांदाच अयान मुखर्जीचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’मध्ये एकत्र दिसून येणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन आणि मौनी रॉय देखील मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर आलिया लवकरच तख्त, रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि डार्लिंग्स चित्रपटात दिसून येणार आहे. तर रणवीर हा श्रद्धा कपूरसोबत एका चित्रपटात काम करत आहे.