प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत विविध विकासकामे करण्यात येत असून आरटीओ चौक व चव्हाट गल्ली कॉर्नरला भुयारी गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र क्लोज डाऊननंतर सदर कामे बंद ठेवण्यात आली आहेत. वास्तविक पाहता वाहतूक वर्दळ कमी असल्याने तातडीने कामे पुर्ण करण्याची मागणी होत आहे.
स्मार्टसिटी योजनेतील कामे सुरू करून चार वर्षे होत आली, पण अद्यापही काही कामे सुरू आहेत. सध्या संग्गोळी रायाण्णा चौक ते अशोक चौक रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात येत आहे. पण कॉक्रीटीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र आरटीओ चौक तसेच चव्हाट गल्ली कॉर्नरला मराठा मंडळ शाळेजवळ भुयारी गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. पण क्लोजडाऊनमुळे काही कामे बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे सदर काम बंद ठेवण्यात आले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन करण्यात आल्याने वाहतूक देखील बंद आहे. त्यामुळे उर्वरीत कामे पुर्ण करणे सोयीचे आहे. मात्र स्मार्टसिटीच्या अधिकाऱयांनी सदर कामे पुर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आरटीओ चौकात खोदाई करण्यात आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. महिन्यापासून रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. तसेच चव्हाट गल्ली कॉर्नरजवळ भूयारी गटारीसाठी खोदण्यात आल्याने वाहतूक बंद आहे. सध्या लॉकडाऊनुमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेडटस् लावण्यात आल्याने वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी वळसा घालावा लागत आहे. अशातच चव्हाट गल्लीकडे जाण्याचा रस्ता बंद असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. काही वाहनधारक पाईपवरून वाहने ने-आण करीत आहे. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
तसेच मेटगुड हॉस्पिटल जवळ रस्त्यावर पेव्हर्स बसविण्यात येणार आहेत. त्याकरिता खडी टाकण्यात आली आहे. पण वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. दुचाकी वाहनधारक घसरून पडत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम लॉकडाऊन संपण्यापुर्वी पुर्ण करण्याची गरज आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात सदर रस्त्याचे काम पुर्ण करावे अशी मागणी होत आहे.