रविवारी मध्यरात्रीची घटना
प्रतिनिधी/ सातारा
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौकात अज्ञात 20 ते 25 जणांच्या माथेफिरू टोळक्याने रविवारी रात्री 11 वाजण्याच्यानंतर तोडफोड करत साहित्य रस्त्यांवर फेकून देत अक्षरशः धुडगुस घातल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे टपऱयाचालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रत्येक टपरी चालकाचे सुमारे 15 हजारांहून अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, तोडफोड करणाऱया माथेफिरू टोळक्यातील युवकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला लागून काही टपऱया टाकण्यात आल्या आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज जिह्याच्या विविध भागातून मोठय़ा प्रमाणावर नागरिक येत असतात. त्यामुळे तेथील गाडय़ांवर नागरिकांची गर्दी मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. मात्र, रविवारी रात्री 11 वाजल्यानंतर अज्ञात 20 ते 25 जणांच्या माथेफिरू टोळक्याने तेथील 10 टपऱयांची तोडफोड करत त्यातील साहित्य रस्त्यावर फेकून दिल्याने हातावर पोट असलेल्या टपऱयाचालकांचे 15 ते 20 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
मार्च ते जून दरम्यान जिह्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गाडीचालक मालकांचे फार मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. संचारबंदी उठविल्यानंतर व्यवसाय पूर्वपदावर येत असताना अशा प्रकारचे भ्याड कृत्य झाल्याने टपरी चालकांनी संताप व्यक्त केला असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होवू लागली. या परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामांसाठी येणाऱयांची संख्याही अधिक असते. यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱया वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी या टपऱयांनी अतिक्रमण केले असून त्यांच्या दुकानासमोर वाहन का लावले यावरूनही अनेकदा वादाचा प्रसंग घडलेले आहेत.
संचारबंदी असताना हुल्लडबाजी
विशेष म्हणजे सातारा जिह्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 नंतर या माथेफिरू टोळक्याने दहशत निर्माण करत 10 गाडय़ांची तोडफोड केल्याने कुठे आहे संचारबंदी असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होवू लागला आहे. संचारबंदी असताना गाडय़ांची तोफफोड करत माथेफिरू टोळक्याने पोलिस प्रशासनाला आव्हान दिले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन या हुल्लडबाजांना जेरबंद करावे लागणार आहे.
रात्रगस्त वाढवण्याची गरज
सध्या संचारबंदी लागू असली तरी अनेक मद्यपींकडून शहरातील मोकळय़ा जागांचा वापर होत आहे. मद्यपी युवक शहर व परिसरातील मोकळय़ा जागी बार बनवत असून मोठमोठय़ा आवाजात बोलण्यामुळे आणि त्यांच्यातील भांडणांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. शहर व उपनगर परिसरातील मोकळय़ा परिसरात रात्रगस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.