वार्ताहर/ माखजन
संगमेश्वर तालुक्यातील आरवली नाचारेवाडी येथील अशोक जोगले यांच्या बकरीवर अचानक बिबटय़ाने हल्ला करून ठार मारले. मागील अनेक दिवसा पासून आरवली परिसरात बिबटय़ाचा मुक्त संचार सुरु आहे.
बुधवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान नेहमी प्रमाणे अशोक जोगले आपल्या बकऱयाना घेऊन वस्तीशेजारी पडसर जागेत चरावयास घेऊन गेले होते. मात्र अगोदरच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने कळपावर अचानक हल्ला केला. त्यावेळी एक बकरी त्याची शिकार होऊन मृत्यूमुखी पडली, तर इतर बकऱया भयभीत झाल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जोगले यांना काही करावे सुचले नाही त्यानी बकरीला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला..सद्या या परिसरात भीतीचे वातावरण आहे .मुक्तसंचार करणाऱया या बिबटय़ाचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.
अतिशय गरीब परिस्थितीत जोगले यांचे कुटुंब बकाऱया सांभाळून उदरनिर्वाण करत आहे त्यास वन विभागाने तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी अन्यथा जोगले यांच्या परिवाराला घेऊन उपोषणाचा निर्णय घेऊ.
– माजी पं सं सदस्य नाना कांगणे