प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे कवी संमेलन आणि काव्य चर्चा असा संयुक्त कार्यक्रम रविवारी पार पडला. अध्यक्षस्थानी कवी शिवाजी शिंदे होते. संमेलनाचे उद्घाटन शब्दगंधच्या सदस्या अश्विनी ओगले यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ. विनोद गायकवाड, डॉ. चंद्रकांत वाघमारे, प्रा. मनीषा नेसरकर, डॉ. मैजोद्दीन मुतावल्ली, डॉ. संजय कांबळे, प्रा. अशोक अलगोंडी उपस्थित होते.
यावेळी अश्विनी ओगले यांनी सर्व नवोदितांना प्रोत्साहन देण्याचे काम संमेलनातून होते, असे मत व्यक्त केले. शिवाजी शिंदे यांनी कवी जगण्याचा शोध घेतो. त्यातून कविता निर्माण होते, असे सांगितले. या संमेलनात मनीषा नाडगौडा, रोशनी हुंदरे, चंद्रकांत गायकवाड, संजय कांबळे यांनी काव्य सृजनावर चर्चा केली. डॉ. विनोद गायकवाड यांनी काव्य निर्मितीचे विविध पैलू उलगडून दाखविले. त्यानंतर भरत गावडे, शीतल पाटील, संदीप मुतगेकर, अस्मिता देशपांडे, निकिता भडकुंबी, स्नेहा जोशी, स्मिता किल्लेकर, अंजली देशपांडे, अपर्णा पाटील, अमृता पवार, पुष्कर ओगले, रेखा गदरे, महादेव खोत, जितेंद्र रेडेकर, सुधाकर जोगळेकर यांनी काव्य वाचन, प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत वाघमारे, मनीषा नेसरकर यांनी परिचय व अशोक अलगोंडींनी सूत्रसंचालन, प्रा. मैजोद्दीन यांनी आभार मानले.