स्वतःची काळजी कशी घ्यावी यासंबंधी दिली माहिती : अनेकांना आरोग्यविषयक समस्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात करोनामुक्त होणाऱयाचे प्रमाण वाढत असले तरी एक गंभीर समस्या समोर आली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांना आरोग्याच्या समस्या दिसत आहेत. अशक्तपणा किंवा शरिराचा एखादा भाग खराब होणे यासारख्या समस्या कोरोनामुक्त होणाऱया बऱयाच रुग्णांमध्ये दिसत आहेत. त्यामुळे या समस्यांना समोर ठेवून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनामुक्त झालेल्यांसाठी काही सूचना आणि उपाययोजना (पोस्ट कोविड-19 केयर प्रोटोकॉल) सुचवले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी, याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने केलेल्या सूचनांनुसार कोरोनामुक्त झालेल्यांनी नियमित मॉर्निंग वॉकला किंवा सायंकाळी चालायला जावे. तसेच दररोज योग अभ्यासही करावा. तसेच कोरोनामुक्त झालेल्यांनी नियमित चवनप्राश, हळदीचे दूध, गिलोय पावडर, अश्वगंधासारख्या रोगप्रतिराकशक्ती वाढवणाऱया पदार्थांचा समावेश करावा. याशिवाय दररोज सकाळी कोमट पाण्याने गुळणी भरावी आणि गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्याशिवाय, सहज पचेल अशा संतुलित अन्नाचे सेवन करावे, असे सुचविण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या सुचनेमध्ये कोरोनामुक्त झालेल्यांना आयुष औषधे घेण्यासही सांगितली आहेत. ही औषधे फक्त रजिस्टर्ड डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच मिळतील. ज्यांचा घसा खरखर करतो त्यांनी नियमित कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. कोरोनामुक्त झालेल्यांनी मास्क, हँड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचे पालन करावे. याशिवाय नियमित कोमट पाण्याचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.