प्रतिनिधी/ सातारा
गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने सातारा पालिकेचा आरोग्य विभाग वादग्रस्त राहिलेला आहे. लोकांच्या समस्या सुटता सुटत नाही. मात्र, आरोग्य विभागात टक्केवारीला आलेला उत्त, लाचलुचपतची कारवाई, पुन्हा दिलेले कारभारी हे त्या संवर्गातील नसल्याने उडालेला गोंधळ अशी सर्व परिस्थिती आरोग्य विभागाची झालेली आहे. सध्या आरोग्य विभागात केडरचे आरोग्य निरीक्षक असताना लिपीकाच्या गळयात कारभारी पद दिल्याने गाडा कसाबसा चालला होता. आता मात्र, सततच्या वाढत्या तक्रारीमुळे कारभाऱयांने रजेचा अर्ज दिला गेला आहे. दि. 1 पासून ते कारभार आस्थापना विभागात काम करणार आहेत. त्यामुळे आता आरोग्य विभागास नव्या दमाचा कारभारी मिळणार आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये शिवदास साखरे हे आरोग्य विभागाचे प्रमुख असताना एवढय़ा तक्रारी नव्हत्या. राजेंद्र कायगुडे यांच्याकडे पदभार गेल्यानंतर त्यांचा रोखठोक स्वभाव त्यांनाच गोत्यात आणत गेला. अन् तात्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी संचित धुमाळ यांच्यासह सर्वच आरोग्य निरीक्षक लाचलुचपतच्या जाळयात अडकले. तेव्हा कोरोनाच्या काळात पुढे आरोग्य विभागाचा गाढा पुढे नेण्यासाठी शहर विकासचे सतीश साखरे आणि अतिक्रमण विभागाचे शैलेश आष्टेकर यांच्याकडे आरोग्याची धुरा दिली. परंतु या दोघांबाबतही नाराजीचा सुर होता. त्यामुळे साखरे यांनी त्या विभागाऐवजी मुळ असलेल्या शहर विकासचे टेबल धरले. तर आष्टेकर यांनी विभागप्रमुख म्हणून काम पाहू लागले. आरोग्य विभागात केडरचे आरोग्य निरीक्षक नव्याने आले. काहीसा कारभार सुधारण्यासाठी प्रयत्न होताना होणाऱया तक्रारीचा पाढा वाढतच राहिला. शैलेश आष्टेकर यांना या तक्रारीचे समाधान करता येईना. त्यामुळे त्यांनी गेल्या पाच दिवसांपूर्वी रजा घेतली की कोणी त्यांना रजा घ्यायला लावली अशी चर्चा सुरु आहे. ते दि. 1 पासून आस्थापना विभागात कामकाज करणार आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता पालिकेच्या आरोग्य विभागात कामकाज नव्या दमाच्या कारभाऱयाकडे कारभार येणार आहे.