उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याचे संकेत : सियामची माहिती
नवी दिल्ली
भारतीय वाहन उद्योग क्षेत्र जवळपास एक वर्षांहून अधिक कालावधीपर्यंत मंदीचा प्रवास करत आहे. यामध्ये आगामी आर्थिक वर्षात यात सुधारणा होण्याचे संकेत आहेत. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे, त्यामुळे आर्थिक संकटाची टक्कर वाहन क्षेत्राला बसणार असल्याची शक्यता सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (सियाम) यांनी मांडली आहे.
कोरोनामुळे वाहन उद्योगाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याचे संकेत असून भारतीय वाहन मॅन्युफॅक्चर्ससाठी लागणारे कच्चे उत्पादन 10 टक्क्यांपर्यंत शेजारी देशांकडून घ्यावे लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उत्पादनाची पातळी गंभीर समस्येत
भारतीय वाहन उद्योगानी चीनेकडून नवीन वर्षासाठी जादाचा कच्चा माल मागविला होता. परंतु यांच्या काही दिवसातच कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे वाहन उद्योग मोठय़ा अडचणीत सापडणार आहे. तसेच बीएस-6 वाहनांचा पुरवठा लवकरात लवकर करण्यासाठी नवीन उत्पादन वाहन उद्योग वाढविणार होता. परंतु त्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात दुचाकी, प्रवासी वाहन, व्यावसायिक वाहन, तीनचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होणार असल्याचे सियामने म्हटले आहे.