ऑनलाईन टीम / मुंबई :
संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार देखील बंद आहे. त्यातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस लोक कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.
या घोषणेनंतर या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट द्वारे देशाला वाचवण्यासाठी आणखी एक उपाय सुचवला आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टकडे पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे.
पुढे ते म्हणतात की, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल या जागतिक संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात विविध धार्मिक ट्रस्टकडे एक ट्रिलियन डॉलर म्हणजेच साधारण 76 लाख कोटी इतके सोने पडून आहे.
सरकारने हे सोने एक किंवा दोन टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे. आणि त्याचा उपयोग लोकांचे जीव वाचवण्यासाठी करावा. कारण ही संपत्ती राष्ट्राच्या मालकीची आहे. असं ही त्यांनी म्हटले आहे.