प्रतिनिधी/ मुंबई
कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानची अखेर 26 दिवसानंतर मन्नत पूर्ण झाली असून शनिवारी सकाळी तो कारागफहाबाहेर आला. त्यानंतर मन्नत बाहेर जल्लोष करण्यात आला.
सकाळी 11च्या दरम्यान आर्यन कारागफहातून आल्यावर प्रसारमध्यमासह अनेकांची त्याला पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. आर्यनच्या अटकेनंतर राज्यासह मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. अमली पदार्थ प्रकरणात आर्यन 26 दिवसांपासून कारागफहात होता. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केला होता. मात्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ततेसाठी शुक्रवारची रात्र आर्यनला तुरुंगात काढावी लागली होती. मात्र, आज शनिवारी आर्यनच्या जामीनाची प्रत आर्थर रोड कारागफहाबाहेरील जामीन पेटीत ठेवण्यात आली होती.
शनिवारी पहाटे अधिकाऱयांनी जामीन पेटी उघडल्यानंतर 9 वाजता आर्यनच्या जामीनावरील प्रक्रिया सुरू झाली होती. 10. 30 च्या सुमारास प्रक्रिया पूर्ण झाली आणि 11 वाजता आर्यनला सोडण्यात आले. अभिनेता शाहरुख खानही कारागफहाबाहेर पोहोचला होता. त्यानंतर आर्यन मन्नत बंगल्याकडे रवाना झाला आहे.
मन्नतबाहेर जल्लोष तर आत दिवाळी
आर्यनच्या सुटकेनंतर मन्नतबाहेर जल्लोष झाला. शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी गर्दी केली आहे. मन्नतला रोषणाई केली आहे. तसेच, शाहरुख व आर्यनचा मित्रपरिवारदेखील मन्नतवर उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
मूनमून धामेचा नियमांच्या फेऱयात 1 लाखांच्या जातमुचकल्यावर आर्यनची सुटका झाली आहे. मात्र, असा जामीन शोधण्यात मुनमुन धामेचाला अडचण आली आहे. तिच्या वकिलांनी तातडीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिला तात्पुरत्या रोख रकमेच्या जामिनावर सोडावे, अशी विनंती तिच्या वकिलांनी केली आहे. मुनमुन ही मध्य प्रदेशाची रहिवाशी असल्यामुळे तिच्यासाठी जामिन राहणारी व्यक्ती शोधण्यात अडचणी येत आहेत.